vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपकास निर्बंध

सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपकास निर्बंध

 

 

 

ठाणे प्रतिनिधी: निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची व रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हादंडाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही, सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही, दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल, सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील, याप्रमाणे निर्बंध घातले आहेत. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 जून 2024 पर्यंत) अंमलात राहतील.

 

0000000000000

संबंधित पोस्ट

मुंबईत कबुतरांना खायला घालणाऱ्यांची आता खैर नाही, पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल, दादर कबुतरखान्याच्या तोडकामाला जमावाचा विरोध- -कबुतरांमुळे कोणालाही काहीही त्रास होत नाही. या भागातील बिल्डर्सची घरं विकली जात नाहीत. त्यामुळे कबुतरखाना हटवण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला. –

तुझ्या हसण्याने मला जगण्याची इच्छा होते” या म्हणीप्रमाणे वांद्रे येथील,जागतिक हास्य दिनानिमित्त बांद्रा एमआयजी ग्राउंड वर अरुणोदयचा उत्सव संपन्न

गणेशोत्सवास प्रारंभ होत असून आरती संग्रहातून नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता व पर्यावरणशीलतेचा संदेश…

मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पाथ्रीकर कॅम्पसला भेट..

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यातून समाजविकासाला बळ : जय हनुमान मित्र मंडळाचा उपक्रम उत्साहात

vishwatmaklokswamivarta

जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रचार रथ मार्गस्थ; 230 गावांमध्ये पोहोचणार शासनाच्या योजनांची माहिती