vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा:राज्यात 11 जागेसाठी मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक 23 टक्के तर बारामतीत सर्वात कमी 14 टक्के मतदान..

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा:राज्यात 11 जागेसाठी मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक 23 टक्के तर बारामतीत सर्वात कमी 14 टक्के मतदान..

 

राज्य प्रतिनिधी

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 च्या ठोक्याला मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर 11: 30वाजेपर्यंत 20 % मतदान झाले. बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या सर्वच 11 मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे पहिल्या 2 टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

 

राज्यात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात 11 वाजेपर्यंत सरासरी 18.18 टक्के मतदान झाले आहे.

 

सातारा – 35 अंश – 18.94 टक्के

 

सोलापूर – 37 अंश – 15.69 टक्के

 

लातूर – 37 अंश – 20.74 टक्के

 

सांगली – 34 अंश – 16.61 टक्के

 

बारामती – 36 अंश – 14.64 टक्के

 

हातकणंगले – 34 अंश – 20.74 टक्के

 

कोल्हापूर – 33 अंश – 23.77 टक्के

 

माढा – 37 अंश – 15.77 टक्के

 

धाराशिव – 37 अंश – 17.06 टक्के

 

रायगड – 33 अंश – 17.18 टक्के

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 32 अंश – 21.19 टक्के

 

जिल्ह्यात 47 कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 23.77 टक्के मतदान झाले आहे.

 

चंदगड- 271- 20.56 टक्के कागल- 273- 23.18 टक्के करवीर -275- 31.95 टक्के कोल्हापूर उत्तर 276- 23.24 टक्के कोल्हापूर दक्षिण 274- 22.55 टक्के राधानगरी- 272- 21.49 टक्के

 

जिल्ह्यात 48 हातकणंगले मतदारसंघात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 20.74 टक्के मतदान झाले आहे.

 

हातकणंगले- 278 – 24.12 टक्के इचलकरंजी 279 – 20.26 टक्के इस्लामपूर- 283- 21.70 टक्के शाहूवाडी- 277- 17.16 टक्के शिराळा- 284- 19.76 टक्के शिरोळ – 280- 21.10 टक्के

संबंधित पोस्ट

आयटीआय बेलापूरमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त-विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

#इतिहासकार_सोडून_गेले…. भावपूर्ण श्रध्दांजली🙏 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला,.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

जलसमृद्ध गाव अभियान’ लोकचळवळ व्हावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पंतप्रधान मोदी भोपाळमध्ये विकास परिषदेचे उद्घाटन करणार

सर्वसामान्यांना महागाईचा फटका; सीएनजी-पीएनजीच्या दरात आजपासून 3 रुपयांची वाढ