vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शासनाकडून मानधन घेणाऱ्या जेष्ठ साहित्यिक व कलावंतांनी 5 जुलै पर्यंत आधारकार्ड अपडेट करावे

शासनाकडून मानधन घेणाऱ्या जेष्ठ साहित्यिक व कलावंतांनी 5 जुलै पर्यंत आधारकार्ड अपडेट करावे

 

जि.प.ठाणे, प्रतिनिधी – शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्यक विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविली जाते. १९५४-५५ या वर्षापासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ आता प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद, ठाणे समाज कल्याण विभागाच्या वतीने लाभार्थ्यांचे आधार कार्ड संकलनाचे काम चालू आहे. लाभार्थी कलाकारांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे जाहिर आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

 

आधार व्हेरीफिकेशन करण्यापूर्वी वृध्द कलावंत यांनी आधार क्रमांक सोबत मोबाईल क्रमांक व बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. ज्यांचे आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करावे.

 

ज्या वृध्द कलावंत व साहित्यीकांचे आधार कार्ड हे मोबाईल क्रमांक व बँक खाते लिंक आहेत, त्यांनी आधार व्हेरीफिकेशनसाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती – शहापूर, अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, समाज कल्याण अधिकारी म.न.पा ठाणे, नवीमुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मिरा-भाईदर व प्रशासन अधिकारी कुळगाव- बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद ठाणे येथे दिनांक 5 जुलै पर्यंत संपर्क करावा अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय बागुल यांनी दिली.

 

तथापी प्राप्त माहितीतील कलावंतांचे मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्राप्त झालेले आधारकार्डची पडताळणी करण्याकरिता सांस्कृतिक कार्यालयामार्फत http://mahakalasanman.org/ AadharVerification.aspx लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेबसाईड मार्फत देखील माहिती तपासणी करता येणार आहे.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवरायांना मानवंदना देत ‘दुर्गोत्सव’ या प्रेरणादायी उपक्रमात सहभागी होण्याचे महाराष्ट्र शासनाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

सामान्य प्रशासन विभाग-प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, गतीमान करण्यासाठी सुधारित महाराष्ट्र शासन कार्य नियमावली…

स्वच्छ भारत अभियान व घनकचरा व्यवस्थापन उपक्रम मिशन मोडवर राबवावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

निर्लेखित साहित्याच्या विक्रीसाठी इच्छुक जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात.

रायगड जिल्ह्यात 24 जून ते 08 जुलै 2025 दरम्यान जमावबंदी लागू     –अपर जिल्हादंडाधिकारी

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या ट्राफिकपासून वाचण्यासाठी अभिनेत्री सारा अली खानने केला लोकल व रिक्षाने प्रवास

vishwatmaklokswamivarta