भारत दहशतवाद खपून घेणार नाही- परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
मुंबई प्रतिनिधी-जोपर्यंत दहशतवादाचा प्रश्न आहे, भारताने शून्य सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर देश आणि जगासाठी दहशतवादविरोधी केंद्र बनलेल्या मुंबईत मी आहे. मुंबईतील ज्या हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला तेथे आम्ही पहिल्यांदा सुरक्षा परिषदेची बैठक घेतली. दहशतवादाच्या या आव्हानासमोर भारत खंबीरपणे उभा आहे. असल्याची माहिती मुंबईत काल झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले
आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीयांच्या नेतृत्वाखाली भारत दहशतवादाशी लढण्यात आघाडीवर आहे. याशिवाय इराण-इस्रायल आणि युक्रेन-रशिया युद्धाच्या संदर्भात भारत आगामी काळात सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे पत्रकार परिषदेचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले
की आपण दहशतवादासाठी शून्य सहिष्णुतेबद्दल बोलतो, तेव्हा हे स्पष्ट होते की, जेव्हा कोणी काही करेल तेव्हा त्याला प्रत्युत्तर दिले जाईल. तुम्ही दिवसा व्यापारी करार करत आहात आणि रात्री दहशतवादी कारवाया करत आहात, तर हे मान्य नाही. आता भारत हे मान्य करणार नाही. हा बदल आहे. आम्ही दहशतवादाचा पर्दाफाश करू आणि जिथे कारवाई करायची आहे, तिथेही कारवाई करू, असं आवाहन यावेळी एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे म्हणाले की विकसित भारत. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यात केंद्र सरकारसारखी विचारधारा असलेल्या सरकारची गरज आहे