आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी- चीनचा पराभव करुन रचला नवा इतिहास भारताने अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव केला. भारतीय खेळाडूं ची धमाकेदार कामगिरी…
खेळ प्रतिनिधी –
बिहारमधील राजगीर येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय महिला संघाने तिरंगा फडकावला आणि चीनचा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. भारताने अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव केला.भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत बहुतांश वेळा चेंडू आपल्या नियंत्रणात ठेवला तर दुसरीकडे चीनच्या खेळाडूंना सामन्यात एकही गोल करता आला नाही. भारतासाठी सामन्यातील एकमेव गोल दीपिकाने केला आणि तिच्या गोलच्या जोरावर भारताला विजेतेपद मिळवण्यात यश आले.
सलीमा टेटे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये वर्चस्व गाजवले आणि संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. भारताने उपांत्य फेरीत जपानचा पराभव केला होता. भारताने तिसऱ्यांदा (2016, 2023, 2024) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे.