vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविणार- माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविणार- माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : – भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गति देण्याच्या उद्देशाने रविवार 5 जानेवारी रोजी राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये जालना जिल्ह्यात या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून प्रत्येक बूथ पर्यंत पोहोचून जास्तीतजास्त नागरिक भाजपाशी जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार आहेत.

माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विकसित भारत घडविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश त्यादिशेने वाटचाल करत आहे. याच वाटचालीचा एक भाग म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्र घडवण्याचे ध्येय आपण सर्वांनी बाळगले आहे. भाजपची संघटना अधिक बळकट व्हावी आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे वर्चस्व वाढावे, यासाठी सदस्य नोंदणी अभियान महत्त्वपूर्ण आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्येक घराघरात पोहोचण्याचे काम या सदस्यता अभियानाद्वारे करावे लागेल. भाजपा पक्ष हा एक विशाल कुटुंब आहे. अधिक सदस्य नोंदणी केल्याने पक्षाची ताकद वाढते आणि आपण अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो, ही बाब लक्षात घेत अनेक सामाजिक कार्यकर्ते भाजपा परिवारात प्रवेश करत आहेत. आपण सर्वांनी ही भाजपचे सदस्यत्व स्वीकारून देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे व सर्वांनी रचनात्मक नियोजन करून प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित ठेवावे असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी केले आहे.बाबासाहेब पाटील कोलते प्रसिद्धीप्रमुख भारतीय जनता पार्टी जि.जालना

0000

संबंधित पोस्ट

पत्रकारांसाठी कार्यशाळा तज्ज्ञांनी सांगितले कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि शुद्धलेखनाचे मंत्र..

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

लोकसंख्या, महानगरांची होणारी वाढ, औद्योगिक क्षेत्रे यामुळे अग्निशमन सेवेचे कार्य आव्हानात्मक – राज्यपाल सी पी राधाकृष्णन अग्निशमन संशोधन संस्था निर्माण करण्याचे आवाहन

रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत वसगडेतील बाधित शेतजमिनींच्या भूभाडे निश्चितीसाठी 30 मे पर्यंत स्थळ पंचनामे करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे

राष्ट्रपतींचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत

बीडच्या विकासासाठी वाढीव निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा नियोजनाचा ५७५ कोटींचा आराखडा सादर