vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गात बदल..

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गात बदल..

जालना प्रतिनिधी : मराठवाडयातील काही मराठा समाज दिनांक 26 ऑगस्ट, 2025 रोजी पासुन अंतरवाली सराटी या ठिकाणी जमणार आहे. त्यामुळे दिनांक 26 ऑगस्ट, 2025 रोजी मराठवाडयातील जालना जिल्हा वगळता इतर जिल्ह्यातील सुमारे 10 ते 12 हजार लोक अंतरवाली सराटी याठिकाणी जमणार असून, सदर आंदोलन यात्रा दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी 10.00 वा. मौजे अंतरवाली सराटी ते मुंबई येथे जाणार आहे.

या यात्रेसाठी अंतरवाली सराटी येथे दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी 40 ते 50 हजार मराठा आंदोलक जमण्याची शक्यता असल्याने सुमारे 10 ते 12 हजार लोक आंदोलन यात्रेत सर्व सामानासह यात्रा सुरु करणार आहे. उरलेली लोक त्यांना बळेगावपर्यंत सोडण्यास येणार आहे.

त्याअनुषंगाने सदर ठिकाणी मोठ्याप्रमाणात जनसमुदाय हजर राहणार आहे. सदर आंदोलन यात्रेच्या वेळी अडथळा निर्माण होवु नये, रस्ता मोकळा राहावा तसेच रस्त्यावर वाहणे उभी राहुन मार्गात अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये. या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधिक्षक, अजय कुमार बंसल, जालना यांना प्रदान केलेल्या शक्ती नुसार जालना शहरातील वाहतुक नमुद पर्यायी मार्गाने वाहतुकीचे नियमनासाठी या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात (Diversion) आले आहे.

    सध्याचा प्रचलित मार्ग पैठण फाटा शहागड ते पैठण दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी मराठा आंदोलन यात्रेच्या अनुषंगाने वाहतुक नियमन बाबत पर्यायी मार्ग बीड गेवराईकडून येणारी पैठण फाटा शहागड मार्गे पैठणकडे जाणारी वाहने ही शहागड पाचोड एनएच 52 या महामार्गाने एकेरी वाहतुक जाण्यासाठी-येण्यासाठी राहणार आहे. वरील आदेश दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी 9.00 वाजेपासून मराठा आंदोलन यात्रा संपेपर्यत अंमलात राहणा असल्याचे पोलीस अधिक्षक कार्यालय, जालना यांनी कळविले आहे.

00000

 

 

संबंधित पोस्ट

शैक्षणिक गुणवत्ता संमेलन परिषद; शिक्षकांनी त्यागी वृत्तीने ज्ञानदान करुन विद्यार्थी घडवावा…

vishwatmaklokswamivarta

नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच ‘आफ्रिकन सफारी’ चा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि एनबीसीसीमध्ये सामंजस्य करार

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती बैठक जलजिवन मिशन कामांची तालुकानिहाय पाहणी करा-खा.भुमरे

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या अडचणींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प व अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा

अन्न, नागरी पुरवठा विभाग-राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

निसर्गोपचारआश्रम चा ८१ वा स्थापना दिवस उत्साहात पार पडला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित