vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य;जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य;जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

राज्य प्रतिनिधी बुलढाणा,  : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही सरकारने ग्रामीण भागातील गरीब आणि वंचित कुटुंबांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी राबवलेली योजना आहे. या पर्यावरणपूरक योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

ग्रामीण महाराष्ट्रासाठी वीज ही केवळ मूलभूत गरज नाही, तर एक विकासाची संधी आहे. “सूर्यघर मोफत वीज योजना” ही योजना ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वच्छ, नवीकरणीय आणि दीर्घकालीन उपाय असल्यामुळे ही योजना पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘महावितरण’कडून विविध माध्यमातून योजनेचा प्रसार करण्यात येत आहे. योजनेत सहभागी होणा-या ग्राहकांना सर्व प्रकारचे तांत्रिक सहकार्य केले जात आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत भाग घेणाऱ्या नागरिकांना प्रति किलोवॅट 30 हजार याप्रमाणे प्रथम दोन किलो वॅटसाठी 60 हजार आणि तिसऱ्या किलोवॅटसाठी 18 हजार असे एकुण ७८ हजारांचे अनुदान केंद्र शासनामार्फत थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात येते. या योजनेकरिता बँकेमार्फत नागरिकांना कर्जही देण्यात येते.

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आदिशक्ती अभियानाचा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के सहभाग घेण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्यक्रमांनी महिला गौरव सप्ताहाची सांगता-सकारात्मकता निर्माण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कुंभमेळ्याच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्वाचा – मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; मोती तलावातील मूर्ती बसविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

खुल्या प्रवर्गातील युवकांना २१ दिवसांचे उद्योजकता प्रशिक्षण‘अमृत’चा उपक्रम