
बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल…
राज्य प्रतिनिधी-
बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुख हत्याप्रकरणात आज 8जणांना मोक्का लागला आहे. राहिलेला आठवा सुद्धा मोक्यात गेला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा 302 झाला पाहिजे. यामध्ये सुद्धा आका आहे. तोच मेन असल्याचा हल्लाबोल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. वरच्या आकाने 19 ऑक्टोबरला स्वत: सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली. तो यामध्ये आरोपी का नाही? असा सवाल धसांनी केला. दीड़ कोटीसाठी संतोष देशमुखांची हत्या केली आहे. वाल्याकाका दीड नाहीतर संतोषसाठी आम्ही 3 कोटी गोळा करुन दिले असते असेही धस म्हणाले.



