vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल…

बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल…

 

राज्य प्रतिनिधी-

बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुख हत्याप्रकरणात आज 8जणांना मोक्का लागला आहे. राहिलेला आठवा सुद्धा मोक्यात गेला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा 302 झाला पाहिजे. यामध्ये सुद्धा आका आहे. तोच मेन असल्याचा हल्लाबोल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. वरच्या आकाने 19 ऑक्टोबरला स्वत: सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली. तो यामध्ये आरोपी का नाही? असा सवाल धसांनी केला. दीड़ कोटीसाठी संतोष देशमुखांची हत्या केली आहे. वाल्याकाका दीड नाहीतर संतोषसाठी आम्ही 3 कोटी गोळा करुन दिले असते असेही धस म्हणाले. 

 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सुरेश धस बोलत होते. राजुरीत जामखेड नावाचं गाव आहे. तिथं एक अपघात झाला. यावेळी गाडीच्या चाकखाली कुत्रा मेला आम्ही गाडीत बसणाऱ्या सर्वांना वाईट वाटलं. पण संतोषला कुठल्या पद्धतीने मारलं. मारताना तो पाणी मागत होता पण त्याला पाणी दिलं नाही असे सुरेश धस म्हणाले. धाय मोकलून रडणाऱ्या माणसाच्या व्हिडिओ काढला आणि आकाला दाखवल्याचे धस म्हणाले. तुम्ही 100 लोकात मारुन त्याला घरी पाठवल्याचे सुरेश धस म्हणाले. तुमच्याकडे पैसा आणि माज आलाय असेही धस म्हणाले.

संबंधित पोस्ट

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

महिला दिनी ‘अस्मिता लीग’चे उद्घाटन; महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे -केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्याव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कालबद्ध नियोजन करावे..

गडचिरोली पोलिसांची अवैध कोंबडा झुंज आणि जुगाराविरुद्ध मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणे हीच खरी सुरक्षितता – गडचिरोली पोलिस

vishwatmaklokswamivarta

बाल हक्क संरक्षण परिषद बालकांच्या हक्कांचे संरक्षण आपले उत्तरदायित्व- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta