vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यातील फेरफार निकाली काढण्यासाठी2 फेब्रुवारीला फेरफार अदालतीचे आयोजन

जिल्ह्यातील फेरफार निकाली काढण्यासाठी2 फेब्रुवारीला फेरफार अदालतीचे आयोजन

 

         राज्य प्रतिनिधी  जालना,:- जिल्ह्यात अनेक ठिकाणी खरेदी विक्री, वारसाद्वारे व इतर कारणास्तव मालकी हक्कामध्ये बदल होण्याचे अनेक विषय असतात. त्यामुळे फेर फाराची अनेक प्रकरणे तलाठी यांच्याकडे प्राप्त होत असतात. अनेक प्रकरणे वेळेत निकाली न निघाल्याने तसेच ती प्रलंबित राहिल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात तक्रारी करत असतात. तरी सर्व प्रलंबित फेर फार तातडीने निकाली काढून शुल्य प्रलंबितता आणण्यासाठी जिल्हाभरात 2 फेब्रुवारी 2025 रोजी एकाच दिवशी प्रत्यक्ष फेर फार अदालतीचे आयोजन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

 प्रलंबित फेरफार निकाली काढण्यासाठी सर्व मंडळ अधिकारी यांच्या मुख्यालयात दि.2 फेब्रुवारीला महसूल अदालतीचे आयोजन करण्यात यावे. दि.24 ते 27 जानेवारी 2025 कालावधीत तहसीलदारांनी त्यांच्या अधिनस्त मंडळनिहाय प्रलंबित असलेल्या फेरफाराचा आढावा घ्यावा. दि.28 ते 29 जानेवारी कालावधीत दुय्यम निबंधक यांच्याशी चर्चा करुन पाठविलेल्या खरेदी विक्री व्यवहाराचा आढावा घेण्यात येईल. दि.30 जानेवारीला फेरफार अदालतीचे नियोजन व प्रसिध्दी करण्यात येईल. दि.31 जानेवारी 2025 रोजी तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्यास्तरावर सुनावणीसाठी प्रलंबित फेर तात्काळ सुनावणी घेवून निकाली काढावेत तर दि.2 फेब्रुवारीला प्रत्यक्ष फेरफार अदालत घेण्यात यावी. सर्व मंडळ अधिकारी व त्याच्या अधिनस्त सर्व तलाठी यांना संपुर्ण दप्तरासह अदालतीच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता हजर राहण्याच्या सुचना निर्गमित कराव्यात. मंडळ अधिकारी यांचे कार्यालय नसल्यास ग्रामपंचायत किंवा इतर शासकीय इमारतीच्या ठिकाणी अदालत घ्यावी. शेतकऱ्यांना, नागरिकांना, मंडळ अधिकारी व तलाठी यांना बसण्याच्या व्यवस्थेसह लागणारे साहित्य, संगणक प्रणाली, लॅपटॉप अद्यावतरित्या उपलब्ध करुन द्यावा. तसेच या ठिकाणी उपक्रमाचा फलक, इत्तिवृत्तासाठी तसेच स्वाक्षरीसाठी नोंदवही ठेवावी. फेरफाराबाबत वाद किंवा शंका असतील तर सुनावणी त्याच दिवशी अदालतीच्या ठिकाणी घ्यावी याबाबत दोन्ही पक्षकारांना आगाऊ नोटीस पाठविण्यात यावी. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी अदालतीचे संपुर्ण नियोजन करावे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ आयोजित

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण -सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त,मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार, मदत व बचाव कार्याचा दावोस येथून समन्वय..

vishwatmaklokswamivarta

जालना येथील घाणेवाडी येथे गुरूवारी संदल शरीफ

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी सचिन आडे पाटील