vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लोकाभिमुख प्रशासन, अबाधित कायदा व सुव्यवस्थेस प्राधान्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे

लोकाभिमुख प्रशासन, अबाधित कायदा व सुव्यवस्थेस प्राधान्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे

 

        सांगलीl) प्रतिनिधी: जिल्ह्यात प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणतानाच लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी प्रयत्न असतील. तसेच, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे (भा. प्र. से.) यांनी  येथे दिली.

सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी (भा. प्र. से.) यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते. आपणास सांगलीतील कामाचा पूर्वानुभव असून, जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालात अधिक चांगले काम करू, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे सर्व विभाग प्रमुखांनी स्वागत केले. जिल्हाधिकारी अशोक काकडे सारथी, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. तिथून त्यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे हे सन 2010 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. श्री. अशोक काकडे यांनी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड, महिला व बालकल्याण आयुक्त, पुणे येथे म्हाडाचे संचालक या पदांवर काम पाहिले आहे.

तत्पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सन 2003 ते 2006 या कालावधीत निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली या पदावर काम केले असून, सांगलीतील दुष्काळ, महापुराच्या आठवणी व त्यावेळी केलेल्या सर्वोत्तम कामांच्या आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला.00000

संबंधित पोस्ट

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ कथासंग्रहाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (#आयटीआय) येथे राबविण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

जालना शहर महापालिका प्रशासनाचे लेखी आश्‍वासन शौला चौकातील मयुर अग्रवाल, गणेश लुटे यांचे उपोषण तुर्त मागे..

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला वेग*शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती,गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.

vishwatmaklokswamivarta

अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन समन्वयाने काम करावे-राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

vishwatmaklokswamivarta