vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर

नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर..

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना रेल्वेने रविवारी प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपये देण्यात येतील, असे रेल्वेने म्हटले आहे. शनिवारी रात्री उशिरा गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी संध्याकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्युंबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुःख व्यक्त केलं. वैष्णव यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे मला खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासाठी माझ्या प्रार्थना आहेत. या दुःखद घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांना मदत करण्यासाठी संपूर्ण टीम काम करत आहे.

संबंधित पोस्ट

ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट जलसंधारण दिवस म्हणून साजरा महा वॉकेथॉन २०२६ मध्ये समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा प्रथम क्रमांक

सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवात ‘आदर्श गाव’ संकल्पना राबवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाराज्यात 22 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीतपंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव…

हा केवळ श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन*1 मे पासून डिजिटल जनगणनेला सुरुवात..