नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर..
नवी दिल्ली प्रतिनिधी
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना रेल्वेने रविवारी प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपये देण्यात येतील, असे रेल्वेने म्हटले आहे. शनिवारी रात्री उशिरा गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी संध्याकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्युंबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुःख व्यक्त केलं. वैष्णव यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे मला खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासाठी माझ्या प्रार्थना आहेत. या दुःखद घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांना मदत करण्यासाठी संपूर्ण टीम काम करत आहे.