vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी-

गुरु तेग बहादुर यांच्या हौतात्म्याच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुमत समागम कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले.गोरेगाव, नेस्को येथील गुरुमत समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी गुरुमत समागम कार्यक्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले “गुरु तेग बहादुरजींनी देश, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या त्यागामुळेच आपण आज आपल्या परंपरा आणि संस्कृती जपू शकतो.” त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे. गुरु तेग बहादुरजी यांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये त्याग, निःस्वार्थ सेवा आणि धर्मनिष्ठा यांचे महत्त्व अधोरेखित होईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गुरु गोविंद सिंगजी यांनी देखील धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी महान कार्य केले. उत्तरेत गुरुजनांनी संरक्षण केले, तर दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी लढा दिला, असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील पानमसाला वरील बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महिलांची पतसंस्था स्थापन करणे बाबतचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद येथील गुलाब चक्रीवादळाने शहराला जोरदार तडाखा दिला, नद्या तुडूंब पावसाचा कहर शहर

vishwatmaklokswamivarta

धार्मिक अल्पसंख्यांक शाळांनी अनुदान योजनेसाठी15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

म्हाडा छत्रपती संभाज नगर विभाग मंडळातर्फे ९४१ सदनिका ३६१ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर**संगणकीय प्रणालीनुसारआजपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा सुरू* 

vishwatmaklokswamivarta

10 जुलै रोजी ईद निमित्त कोणत्याही ठिकाणी अवैध्यरित्या जनावरांच्या कत्तली होत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लक्ष्मीनारायण मोदी यांच्या आदेशाचे पालन करा जीव मैत्री संस्था.

vishwatmaklokswamivarta