vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी-

गुरु तेग बहादुर यांच्या हौतात्म्याच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुमत समागम कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले.गोरेगाव, नेस्को येथील गुरुमत समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी गुरुमत समागम कार्यक्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले “गुरु तेग बहादुरजींनी देश, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या त्यागामुळेच आपण आज आपल्या परंपरा आणि संस्कृती जपू शकतो.” त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे. गुरु तेग बहादुरजी यांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये त्याग, निःस्वार्थ सेवा आणि धर्मनिष्ठा यांचे महत्त्व अधोरेखित होईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गुरु गोविंद सिंगजी यांनी देखील धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी महान कार्य केले. उत्तरेत गुरुजनांनी संरक्षण केले, तर दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी लढा दिला, असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

संबंधित पोस्ट

ग्लोबल महाराष्ट्र बिझनेस फोरम (GMBF) तर्फे ‘महाबिझ दुबई २०२६’ची लंडनमध्ये घोषणा – जागतिक व्यावसायिक सहयोगासाठी प्रभावी मंच!

vishwatmaklokswamivarta

लेख-एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे.

धारावीत धारावी पुनर्वसन प्रकल्प अडाणी  तर मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विनायक विसपुते मुकादम उमेश वाघ ज्युनिअर इंजिनियर मस्के, कदम यांच्या आशीर्वादाने संपूर्ण धारावी मध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे चालू ..

vishwatmaklokswamivarta

मुंबई डीआरआयने कोकेन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला, मुंबई विमानतळावर 17.18 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; एकाला अटक

vishwatmaklokswamivarta

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रेशिम विभाग आपल्या दारी’ मोहिम

vishwatmaklokswamivarta