vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 जालना, प्रतिनिधी :- प्रादेशिक हवामानशास्‍त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्‍ह्यात दि. 1 ते 2 एप्रिल 2025 या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्‍या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 50-60 कि.मी.प्र.ता. वेगाने) व गारपीट होण्‍याची तर 3 एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्‍या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्‍या ते मध्यम स्‍वरुपाच्‍या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. तसेच दि. 4 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्‍वरुपाच्‍या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती दक्षता बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे.
मेघगर्जनेच्‍या वेळी, विज चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विज चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. आपत्कालीन परिस्थितीत जिल्‍हाधिकारी कार्यालयातील जिल्‍हा नियंत्रण कक्ष ०२४८२-२२३१३२ वर तसेच नजीकच्या तहसील कार्यालयात, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास विधी सेवा प्राधिकरणात दावा दाखल करता येणार   – सचिव गि. ग. कांबळे- कायदेशीर वारसांना सहा लाखांची भरपाई- मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

vishwatmaklokswamivarta

भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त “संविधान गौरव महोत्सव”- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सहा हजार महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

बिहार निवडणूक 2025 टप्पा-1: ऐतिहासिक 64.66% मतदान निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांमुळे मतदारांसाठी मतदान हा सर्वात आनंददायी अनुभव बनला

vishwatmaklokswamivarta

इथिओपियन संसदेला संबोधित केल्यानंतर, तेथील मंत्री आणि खासदारांशी संवाद साधल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

vishwatmaklokswamivarta

वायू व ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणा-या18 विकासकांवर बांधकाम स्थगितीची (Stop Work) कारवाई..

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील यांची ९२ वी जयंतीमहामंडळाच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयात साजरी

vishwatmaklokswamivarta