vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कालवा कार्यक्षेत्रात 31 मे पर्यंत मनाई आदेश लागू

आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कालवा कार्यक्षेत्रात 31 मे पर्यंत मनाई आदेश लागू

 

 सांगली प्रतिनिधी:- आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्याकरिता व सर्व लाभधारकांना सम प्रमाणात पाणी वाटप होण्याकरिता जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कडेगाव, पलूस, खानापूर व तासगाव तालुक्यातील एकूण 37 गावामध्ये आरफळ कालवा कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता दि. 10 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 या कालावधीसाठी मनाई आदेश जारी केला आहे.

 या आदेशानुसार कडेगाव तालुक्यातील शेळकबाव, शिरगाव, वांगी व रामपूर, पलूस तालुक्यातील आंधळी, मोराळे, बांबवडे, सांडगेवाडी, पलूस व कुंडल, खानापूर तालुक्यातील भाळवणी, कमळापूर, आळसंद, तांदूळवाडी, वाझर व बलवडी, तासगाव तालुक्यातील निंबळक, चिखलगोठण, आळते, बोरगाव, लिंब, विसापूर, पानमळेवाडी, शिरगाव (वि), ढवळी, तासगाव, चिंचणी, वासुंबे, कवठेएकंद, बेंद्री, शिरगाव (क), नागाव कवठे, कुमठे, निमणी, येळावी, राजापूर, तुरची या गावांमध्ये कालव्या लगतच्या दोन्ही काठापासून 200 मीटर अंतरावर दि. 10 एप्रिल 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 31 मे 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे.

 हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्य कार्यकर्त्याची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड हे संविधानाचे सामर्थ्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे दि.२२ रोजी लोकअदालत

एमएचटी-सीईटी 2025 पीसीएम ग्रुपची 5 मे रोजी फेर परिक्षा…

धारावी विभागातील ज्येष्ठ पत्रकार श्री अरविंद कटके यांचे आकस्मात दुःखद निधन..

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा स्ट्राइड’ उपक्रमाचा शुभारंभ; ‘मित्र’ राज्याच्या विकासाला दिशा देणारी महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावारूपास येईल

vishwatmaklokswamivarta