vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कालवा कार्यक्षेत्रात 31 मे पर्यंत मनाई आदेश लागू

आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कालवा कार्यक्षेत्रात 31 मे पर्यंत मनाई आदेश लागू

 

 सांगली प्रतिनिधी:- आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्याकरिता व सर्व लाभधारकांना सम प्रमाणात पाणी वाटप होण्याकरिता जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कडेगाव, पलूस, खानापूर व तासगाव तालुक्यातील एकूण 37 गावामध्ये आरफळ कालवा कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता दि. 10 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 या कालावधीसाठी मनाई आदेश जारी केला आहे.

 या आदेशानुसार कडेगाव तालुक्यातील शेळकबाव, शिरगाव, वांगी व रामपूर, पलूस तालुक्यातील आंधळी, मोराळे, बांबवडे, सांडगेवाडी, पलूस व कुंडल, खानापूर तालुक्यातील भाळवणी, कमळापूर, आळसंद, तांदूळवाडी, वाझर व बलवडी, तासगाव तालुक्यातील निंबळक, चिखलगोठण, आळते, बोरगाव, लिंब, विसापूर, पानमळेवाडी, शिरगाव (वि), ढवळी, तासगाव, चिंचणी, वासुंबे, कवठेएकंद, बेंद्री, शिरगाव (क), नागाव कवठे, कुमठे, निमणी, येळावी, राजापूर, तुरची या गावांमध्ये कालव्या लगतच्या दोन्ही काठापासून 200 मीटर अंतरावर दि. 10 एप्रिल 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 31 मे 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे.

 हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

निवडणूक आयोगाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ३७९ निवडणूक अधिकाऱ्यांचा सहभाग

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्कØ वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध गोदावरी स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा

vishwatmaklokswamivarta

दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना राखी बांधली

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 ते 8 एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’!