vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करा- मंत्री डॉ. अशोक वुईके

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करा- मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, प्रतिनिधी : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (टीआरटीआय) विविध स्पर्धा परीक्षांसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड तसेच प्रशिक्षण संस्था निवड प्रक्रिया राबविण्यासाठी वेळापत्रक तयार करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ.वुईके म्हणाले, प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षण संस्थांची विशेष पथकाद्वारे कार्यक्षमता व गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. प्रशिक्षण अभ्यासक्रमात आवश्यक बदल करून नवीन कोर्सेसचा समावेश करावा. तसेच पेसा क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच व आदिवासी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत.

आदिवासी समाजाच्या लोककला, बोलीभाषा, संस्कृती व परंपरांचे दृकश्राव्य माध्यमातून संकलन करण्यात यावे. तसेच क्रांतिकारकांची चरित्रे बोलीभाषेत साहित्य स्वरूपात तयार करावीत. याचबरोबर धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत गावांचे आराखडे तयार करावे यासाठीचा आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मंत्री डॉ.वुईके यांनी सांगितले.

००००

 

शैलजा पाटील/विसंअ

संबंधित पोस्ट

रस्ते सुरक्षा जनजागृती ही एक राष्ट्रीय चळवळ असून, रस्ते वापरणाऱ्या सगळ्यांनीच जबाबादारीने वागण्याची अपेक्षा: रस्ते वाहतूक राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा

vishwatmaklokswamivarta

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

समाज कल्याण विभागाच्या गटई स्टॉल योजनेच्या निकषात सुधारणा

तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालव्याच्या क्षेत्रामध्येकलम १४४ जमावबंदी आदेश लागू

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सीमा सुरक्षा दलाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आणि भारताच्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त, बीएसएफच्या पहिल्या सर्व-महिला गिर्यारोहक पथकाने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर केले