vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू

जिल्ह्यात १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू

गडचिरोली, प्रतिनिधी : येत्या १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे. यानिमित्त विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांकडून धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ते १० मे २०२५ रोजी रात्री १२ वा.पर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.

या कालावधीत शस्त्रास्त्र, दाहक व स्फोटक पदार्थ, दगड, क्षेपणास्त्रांची उपकरणे यांचा वापर किंवा वाहतूक, तसेच सभ्यता व नितीमत्तेला धक्का पोहचवणारी भाषणे, गाणी, चित्रफलक किंवा जनतेत अस्थिरता निर्माण करणारी कोणतीही कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय उपविभागीय दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही मिरवणूक काढणे, तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे पूर्णतः मनाई करण्यात आले आहे.

हा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात लागू असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील : मराठवाड्यात २८६ जण कोरोनाबाधित, चौघांचा मृत्यू.

आमदार जयकुमार गोरे यांची कार अपघातानंतर प्रकृती स्थिर, पीएची प्रकृती थोडी चिंतेची; आमदार राहुल कुल यांची माहिती.

vishwatmaklokswamivarta

MSRTC च्या 5 हजार जुन्या बसेसचा होणार कायापालट; ऊर्जा कार्यक्षम आणि इको फ्रेंडली बसेस सुरू करण्यात येणार…

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवावा* – *पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

आज*राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन*

vishwatmaklokswamivarta

संजय राऊत, तुम्हीही हे ध्यानातच ठेवा…”; चित्रा वाघ भडकल्या,  भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी ‘आरे ला कारे’ करण्याची भाषा वापरता येते.