vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार ,सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली  गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार प्रदान !

 केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार ,सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली  गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार प्रदान !

   राज्य प्रतिनिधी-  कन्नूर (केरळ) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी तथा महर्षींच्या आज्ञेने देश-विदेशांत लाखो किलोमीटर भ्रमंती करणार्‍या, तहान-भूक, उन-पाऊस यांची तमा न बाळगता धर्मप्रसार करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’च्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. स्वतःतील आंतरिक शक्ती, दृढ निश्चय आणि कृपाशीर्वाद यांद्वारे नेतृत्व करून दिशादर्शन करणार्‍या महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो.

 ‘सनातन एकल वास्तूरत्न’चे कुलपती ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना हा पुरस्कार प्रदान केला. ‘शिवोहम् स्पिरिच्युअल वेलनेस सेंटर’च्या मुख्य चिकित्सक डॉ. ज्योती शमिथ यांनी प्रमाणपत्र देऊन, तर सौ. सुधा रविंद्रनाथ यांनी शाल प्रदान करून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान केला. ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’ ही अध्यात्म, संस्कृती, ध्यान, योग आदींविषयी जागृती करणारी संस्था असून ती संयुक्त राष्ट्रांच्या ‘यू.एन्. ग्लोबल कॉम्पॅक्ट’शी संलग्न आहे.

  पुरस्कार स्वीकारतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या की, हा पुरस्कार मला मिळाला नसून आमचे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मिळाला आहे. मी केवळ एक माध्यम आहे. गुरुकृपेमुळेच आपण जीवनात यशस्वी होतो. गुरुदेवांच्या कृपेनेच आपले जीवन सात्त्विक होते आणि आपल्या जीवनाला एक अर्थ प्राप्त होतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘मनुष्यजन्माचा प्रमुख उद्देश ईश्वरप्राप्ती करणे हाच आहे, हे मनावर बिंबवून समाजाला अध्यात्म आणि साधना यांकडे वळवले आहे. साधनेमुळे व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक कर्म सात्त्विक झाले, तर ईश्वरप्राप्ती लांब नाही. ‘समाजात साधनेचा प्रचार-प्रसार करणे आणि समाजाला समष्टी साधनेविषयी अवगत करणे’, हा आपला धर्म आहे. यामुळे समाजात जागृती निर्माण होईल आणि आपले राष्ट्र सात्त्विक होईल, असेही त्यांनी सांगितले.

   या वेळी ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य म्हणाले की, आपल्या गुरूंचे कृपाशीर्वाद आणि त्यांचा परीसस्पर्श लाभल्यास आपण अध्यात्माच्या मार्गावर मार्गक्रमण करू शकतो. तर ‘जागतिक शांतता संघटने’चे आंतरराष्ट्रीय महासचिव प्रा. डॉ. सुरेश के. गुप्तन् म्हणाले की, जगात ६५ टक्के जनतेमध्ये निराशा दिसून येते. या सर्व आजारांना मानवी भावना हे कारणआहे. या भावनांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी.व्ही. रविंद्रनाथ यांच्या कन्या शुभा रविंद्रनाथ यांनी कार्यक्रमाच्या आरंभी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर ‘निर्वाण षट्कम’ म्हणण्यात आले. ‘कृष्णा बिच रिसॉर्ट’चे श्री. सुमल यांनी आभारप्रदर्शन केले.श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था,

0000000

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार‘संजीवनी’ प्रकल्पांतर्गत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण; प्रत्येकी ७० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणांची मदत

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता…

ठाणे जिल्ह्यात २३ नोव्हेंबर २०२५(रविवार)रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चे आयोजन१७,०३३ उमेदवार देणार परीक्षा

vishwatmaklokswamivarta

कौटुंबिक समस्यांवर चर्चा, तोडग्या साठी,कौटुंबिक न्यायालयाकडून मार्गदर्शन- न्यायाधीश संजश्री घरत-कौटुंबिक न्यायालय कायदा कार्यकम संपन्न

विविध क्षेत्रातील सौहार्दवृद्धीसाठी बेल्जियमशी सामंजस्य करार बेल्जियमच्या प्रिन्सेस ॲस्ट्रिड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta