पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं; भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते… 💥🔥
नवी दिल्ली प्रतिनिधी-जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे 15 दिवसांनंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. ✌🏻
उल्लेखनीय बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पचं अचूक लक्ष्य साधलं. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.✌️
मोदी सरकारच्या पर्वात प्रत्येक वाईट गोष्टीला असच प्रतिउत्तर देण्यात येतंच, हे परत एकदा सिद्ध झालं आहे. भारत सरकार आणि भारतीय सेना पूर्णपणे पाकिस्तानच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे आणि पाकिस्तानच्या पुढील कारवाईला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्नही ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे