vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गेल्या काही दशकांपासून पारशी लोकसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पारशी समाजाच्या सतत घटणाऱ्या लोकसंख्येवर उपाययोजना म्हणून-जिओ पारसी” योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन..

गेल्या काही दशकांपासून पारशी लोकसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पारशी समाजाच्या सतत घटणाऱ्या लोकसंख्येवर उपाययोजना म्हणून-जिओ पारसी” योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन..

 

ठाणे, प्रतिनिधी:- गेल्या काही दशकांपासून पारशी लोकसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पारशी समाजाच्या सतत घटणाऱ्या लोकसंख्येवर उपाययोजना म्हणून “जिओ पारसी योजना” राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ही योजना केवळ आर्थिक सहाय्यपुरती मर्यादित नसून, ती वैचारिक, सामाजिक व वैद्यकीय मार्गदर्शनाचीही आहे. यामार्फत पारशी समाजाच्या अस्तित्वाचे संवर्धन आणि टिकाव सुनिश्चित करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

धार्मिक अल्पसंख्यांक पारसी समुदायाच्या कल्याणासाठी “जिओ पारसी” ही केंद्रीय क्षेत्रातील योजना राबविण्यात येत आहे. “जिओ पारसी” या केंद्र शासनाच्या विशेष उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर समन्वय, मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येत आहे:

जिल्हास्तरीय समितीचे सदस्यःअध्यक्ष – जिल्हाधिकारी, ठाणेनिमंत्रित सदस्य – जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. ठाणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे, जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे, संबंधित क्षेत्रातील मान्यवर पारसी समाज प्रतिनिधी

सदस्य सचिव – जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी, ठाणे,समितीची कार्यकक्षाः

1. “जिओ पारसी” योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे.

2. ही समिती “जिओ पारसी” उपक्रमाच्या यशासाठी पारसी समाज व केंद्र शासन यांच्यामध्ये एक महत्त्वाचा दुवा असेल. या योजनेच्या लाभांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सल्लामसलत सत्रे व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल.

3. ही समिती लाभार्थ्यांकडून प्रस्ताव प्राप्त करेल, डॉक्टर किंवा क्लिनिकच्या मदतीने त्यांचे मूल्यांकन करेल व उपचारासाठी पात्र लाभार्थ्यांची शिफारस करेल, तसेच भरपाईसाठी आलेल्या खर्चाच्या बिलांची तपासणीही करेल.

4. जिल्हास्तरीय समिती ‘HOC’ (Health of Community) घटकांतर्गत प्राप्त अर्जाचा विचार करण्यासाठी व शिफारस करण्यासाठी दर तीन महिन्यांनी बैठक घेईल.

5. जिल्हा समितीला खालील अधिकार असतीलः

i) सर्व अर्जांची छाननी करणे.ii) पडताळणी झालेल्या व निवडलेल्या HOC अर्जदारांची शिफारस मंत्रालयातील मंजूरी समितीकडे पाठविणे.

0000

संबंधित पोस्ट

महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ यात्रोत्सवानिमित्त वाहतुक मार्गात बदल..

vishwatmaklokswamivarta

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातप्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आयपीएल विजेता रॉयल चॅलजर्स बंगळूरू संघाच्या विजयी सोहळ्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान चार जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे, तर अनेक जण जखमी झाले

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी…

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यात ८ ते २५ एप्रिलदरम्यान ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’