vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 26 जूनपासून विशेष मोहीम

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 26 जूनपासून विशेष मोहीम

            सांगली, प्रतिनिधी) : राजर्षि शाहु महाराज जयंती पर्व दि. 26 जून 2025 ते 4 जुलै 2025 या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. वैधता प्रमाणपत्राअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली कार्यालयात त्वरित अर्ज करावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी (3 वर्षे/ 5 वर्षे विधी) व बी. एड. इत्‍यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग तसेच एसईबीसी (मराठा) या प्रवर्गातील आरक्षण अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेवेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम व नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः 3 ते 5 महिन्यांचा कालावधी समिती निर्णयाकरिता असतो, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित..

केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याने कोट्यवधी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, अर्थसंकल्पाचे स्वागत…केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांचे आभार-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला साजेशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये १५ ते १९ दरम्यान स्पर्धेचे आयोजन

वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या; शेतकरी महिलांना जमिनीच्या अधिकारासाठी शासन प्रयत्नशील..

भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल –  1 जुलैपासून हे लोक ऑनलाइन रिझर्व्हेशन करू शकणार नाहीत, नवीन नियम लागू

सोलापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-महापालिकेच्या इंद्रभुवन येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे