vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आणीबाणीला 50 वर्षे पूर्णजिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीविरोधी सत्याग्रहींचा सन्मान-भारतमाता की जय.. वंदे मातरम् च्या जयघोषाने दुमदुमले सभागृह

आणीबाणीला 50 वर्षे पूर्णजिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीविरोधी सत्याग्रहींचा सन्मान-भारतमाता की जय.. वंदे मातरम् च्या जयघोषाने दुमदुमले सभागृह

ठाणे, प्रतिनिधी आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा सन्मान होणे म्हणजे या सर्व सत्याग्रहींनी त्या काळात सोसलेल्या अनंत यातना व केलेल्या संघर्षाला आदरपूर्वक नमन आहे. सभागृहात आता उपस्थित असलेल्या सर्व आणीबाणी सत्याग्रहींमध्ये आजही तितकाच जोश अन् देशासाठी काहीही करण्याची इच्छाशक्ती दिसत आहे, हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी आज येथे केले.

भारतामध्ये दि.25 जून 1975 ते दि.31 मार्च 1977 या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना लोकशाहीकरिता लढा देताना मिसा डीआयआर अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देवून जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्र.उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन चौधर, आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसलेले आणीबाणीविरोधी सत्याग्रही, दिवंगत आणीबाणीविरोधी सत्याग्रहींचे वारस, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस आणीबाणीच्या काळात लढा देताना दिवंगत झालेल्या सत्याग्रहींना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या सत्याग्रहींचा अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींपैकी प्रातिनिधीक स्वरूपात श्री.अनिल भदे, अनुराधा जुवेकर, रमेश बेदमुथा यांनी आणीबाणी कालावधीतील आपले अनुभव कथन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले. यावेळी त्यांनी आणीबाणी काळातील परिस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली.

00000

संबंधित पोस्ट

आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन होण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू· वाढवण बंदराभोवती नवीन शहर टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट· महाराष्ट्र २०२९ चा कृती आराखडा लवकरच..

vishwatmaklokswamivarta

माननीय खासदार डॉ. कल्याण काळे यांची अन्नामृत फाउंडेशनच्या केंद्रीय स्वयंपाकगृहास सदिच्छा भेट..

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आवारातील“टेरेस गार्डन”च्या निर्मिती उपक्रमाचे उद्घाटन संपन्न

राज्य लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी   – आयुक्त डॉ. किरण जाधव…

vishwatmaklokswamivarta

मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प,मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम…

vishwatmaklokswamivarta