मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प,मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम…
मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प ,दक्षिण मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम…
राज्य प्रतिनिधी-मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दक्षिण मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे निर्यातदार, आयातदार आणि प्रोजेक्ट कार्गो चालकांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, जबल अली नाईनसाठी जाणारी महत्त्वाची अवजड मशिनरी वेळेत पोहोचू न शकल्यास दंड तसेच करार रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हीच स्थिती अनेक ट्रक आणि इतर वाहतुकीच्या साधनांची आहे. निर्यात आणि आयात माल, जो हजारो कोटी रुपयांचा आहे, तो सर्व अडकून पडला आहे. देशभरातील विविध प्रकल्पांसाठी लागणारी मालसामग्रीदेखील अडकल्याने महत्त्वपूर्ण योजना खोळंबल्या आहेत.
ट्रक रिकामे उभे आहेत, चालक नसल्यामुळे वाहनांची तपासणी घेतली जात आहे. त्यामुळे कंटेनरवर डिटेंशन चार्ज, डेमरेज, तसेच मोठ्या प्रमाणावर दंड लागत आहे. या परिस्थितीमुळे आर्थिक संकट आणि मानसिक तणाव वाढला आहे, असे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे माजी अध्यक्ष बल मलकीत सिंह यांनी सांगितले.
जर यावर लवकर उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्र व भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो. मालवाहतुकीच्या खेपा रद्द होत असल्यामुळे आणि व्यापारी करार निष्फळ ठरत असल्यामुळे मोठ्या नुकसानाचा धोका आहे, असेही बल मलकीत सिंह यांनी स्पष्ट केले. आंदोलनाचा अधिकार स्वीकारला असला, तरी जीवनावश्यक मालवाहतूक, निर्यात-आयात माल वाहतुकीस अडथळा येणे समाजहिताचे नाही. त्यामुळे राज्य सरकारने मालवाहतुकीकरिता विशेष सुरक्षा तसेच आपत्कालीन मार्ग मोकळा करावा, अशी मागणी बल मलकीत सिंह यांनी केली आहे.