vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

 

​शिर्डी, प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक येत आहे. औद्योगिकदृष्ट्या जिल्ह्याला मुख्य केंद्र बनविण्याच्या उद्देशाने आवश्यक ती कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

​जिल्ह्यातील शिर्डी, राहुरी व श्रीगोंदा तालुक्यातील औद्योगिक वसाहतींच्या संदर्भात मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरात औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीसंदर्भातील सर्व अडचणी दूर करून प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीबरोबरच राहुरी व श्रीगोंदा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीसाठी कार्यवाही करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी सूचित केले. राहुरी तालुक्यात कृषी विद्यापीठाची जागा औद्योगिक विकासासाठी मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. या औद्योगिक वसाहतींमुळे अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वाढत असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा जिल्ह्याला मोठा लाभ होत आहे. या औद्योगिक विस्तारामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

0000000

संबंधित पोस्ट

सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संध- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,राज्यात बंदरे क्षेत्रात झपाट्याने विकास, गुंतवणूकदारांचे स्वागत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

vishwatmaklokswamivarta

जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला ; आ. कैलास गोरंट्यालजालन्यात दर्गावेस ते पाणीवेस रस्त्याच्या काँक्रिटिकरण कामाचा शुभारंभ

थंडी आणि अंधारापूर्वीच मतदानाचा हक्क बजावावा;ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांना निवडणूक अधिकारी अशीमा मित्तल यांचे आवाहन• हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन• 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 कालावधीत होणार मतदान• मतदार केंद्रापर्यंत जाण्यासाठी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

vishwatmaklokswamivarta

लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय सहकारी पतसंस्था स्थापन*राज्यातील पहिल्या पतसंस्थेला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

मिरवणूकांच्या अनुषंगाने सांगली पोलीस दल सतर्क जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात..

vishwatmaklokswamivarta