vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

संविधान हत्या दिवस साजरा कराल तर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू; सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने यांचा इशारा

संविधान हत्या दिवस साजरा कराल तर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू; सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने यांचा इशारा

राज्य प्रतिनिधी-भाजपने 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने शासकीय कार्यालयात देखील तसे फलक लावण्यात आले आहेत. यावर सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. महेश धन्नावत यांनी आक्षेप घेतल्यानंतर शुक्रवार दि. 27 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने यांच्यासह काही वकीलांनी देखील आक्षेप नोंदविला आहे. जर संविधान हत्या दिवस साजरा कराल तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडू असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आलाय.

जालन्यात वकीलांनी संविधान हत्या दिवस साजरा करण्याला आक्षेप भारतीय संविधान अस्तित्वात आहे. त्यामुळेच लोकशाही असलेला देश संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. त्याचा भारतीय नागरिकांना त्याचा अभिमान आहे

दि. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान स्विकारल्या पासुन सर्व देश हा संविधानाप्रमाणे चाललेला आहे व भारतीय संविधान हे एक पुस्तक नसून पवित्र ग्रंथ आहे. त्यामुळे सर्व भारतीयांच्या मनात संविधानाचे स्थान आहे. असे असतानाही दि 25 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान हत्या दिवस 2025 या फलक लावण्यात आला. हा प्रकार भारतीय नागरीकांची दिशाभूल करणारा, संतापजनक आणि भावना दुखविणारा आहे. भारतीय संविधान हत्या म्हणजे भारतीय संविधान संपले आहे असा त्याचा सरळ अर्थ आहे. हत्या झाल्यानंतर कोणतीही वस्तु शिल्लक राहत नाही. किंवा अस्तित्व राहत नाही आणि असे असेल तर संविधानाची हत्या कोणी केली? त्यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली? असे प्रश्न भारतीय नागरीकाना पडणे स्वभावीक आहे. संविधानाची हत्या झाल्या पासून भारत देशाचा कारभार मागील 50 वर्षापासून कसा चालत आहे? अस सवाल वकीलांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आलाय.

या पूढे अशा फलकासह कोणत्या ही प्रकारचा संविधान हत्या दिवस साजरा करण्यात येऊ नये, नसता पुढील भारतीय पिढीवर त्याचे दुष्परिणाम होतील. त्यामुळे संविधान हत्या दिवसाचे फलक लावल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला. यावेळी अ‍ॅड. मा.नि. बनसोडे, अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने, अ‍ॅड. महेश धन्नावत, हरिनारायण जैस्वाल, अ‍ॅड. वैभव खरात, अ‍ॅड. सागर बनसोडे, अ‍ॅड. शुभम भारुका, अ‍ॅड. व्हि.एल.पांडव, अ‍ॅड. सुभाष बोर्डे यांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

एक जिल्हा, एक उत्पादन- 2024’ पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी राज्याला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक कृषी आणि गैर कृषी क्षेत्रात रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी..

रायगड जिल्ह्याच्या प्रगतीत बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा-जिल्हाधिकारी किशन जावळे*

पारसी टेकडी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार          -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,केशवसृष्टी इरकॉन घनवनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

निराधार मुलांच्या आधार नोंदणीसाठी ‘साथी’चा आधार,एकही निराधार बालक आधार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे

जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी 

नक्षलवादविरोधी लढाईत एक ऐतिहासिक यश-सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सीपीआय-माओवादी सरचिटणीस बसवराजू यांच्यासह २७ माओवाद्यांना कंठस्नान घातले 

vishwatmaklokswamivarta