vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

बुलढाणा प्रतिनिधी): केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार व निर्देशांकांच्या आधारे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे राज्यस्तरावरून करण्यात आलेल्या मुल्यांकनात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत राज्यातील अव्वल पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवले आहे. सदर मुल्यांकन १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामगिरीवर आधारित होते.या यशामध्ये जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपसंचालक (आरोग्य सेवा) अकोला मंडळ डॉ. सुशिल वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे यांनी प्रभावी कामगिरी बजावली.

दरम्यान, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. वर्षा श्रीधर गुट्टे यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्याच्या या यशामुळे क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने बुलढाणा जिल्हा ठोस पावले टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना…

मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी खुशखबर- महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली, गो अर्ली ही सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानपरिषदेत केली.

बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष निवडणूक तपासणी  मोहिमेत मतदार पडताळणी दरम्यान नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार येथील काही व्यक्ती सापडल्या आहेत.१ ते ३० ऑगस्ट दरम्यान सखोल चौकशी होणार असून, अयोग्य आढळलेल्या नावांना ३० सप्टेंबरला अंतिम यादीतून वगळण्यात येईल.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना यश- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद मंदिरांचे दरवाजे उघडले, गावोगावी पुन्हा घुमला घंटानाद!

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta