vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

बुलढाणा प्रतिनिधी): केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार व निर्देशांकांच्या आधारे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे राज्यस्तरावरून करण्यात आलेल्या मुल्यांकनात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत राज्यातील अव्वल पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवले आहे. सदर मुल्यांकन १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामगिरीवर आधारित होते.या यशामध्ये जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपसंचालक (आरोग्य सेवा) अकोला मंडळ डॉ. सुशिल वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे यांनी प्रभावी कामगिरी बजावली.

दरम्यान, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. वर्षा श्रीधर गुट्टे यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्याच्या या यशामुळे क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने बुलढाणा जिल्हा ठोस पावले टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं सतर्क राहा! वादळी वाऱ्यांचा परिणाम समुद्रापासून; मुंबईपासून विदर्भापर्यंत कधीही कुठंही सुरू होणार धुवाधार पाऊस..

vishwatmaklokswamivarta

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H२OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी-मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

vishwatmaklokswamivarta

सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरणआमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

विकास कामे वेळेत करून निधीचे योग्य व्यवस्थापन करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा गौरव !पर्यावरणमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार