vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

आयुष्मान कार्डसाठी ३१ ऑगस्ट अंतिम मुदत

आयुष्मान कार्डसाठी ३१ ऑगस्ट अंतिम मुदत

रायगड प्रतिनिधी-जिल्ह्यातील नागरिकांना ‘एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (एबी-पीएमजेएवाय) ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना’ (एमजेपीजेएवाय) यांचा लाभमिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत नागरिकांना ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ तयार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असून, यामध्ये १ हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया व विशेष उपचारांचा समावेश आहे. तसेच कुटुंबातील ७० वर्षांवरील सदस्यांना ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड’च्या माध्यमातून अतिरिक्त पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे आयुष्मान भारत गोल्ड कार्ड असणे बंधनकारक आहे.

याशिवाय आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र, तसेच स्वस्त धान्य दुकानदार (रेशन दुकानदार) यांच्या माध्यमातूनही कार्ड तयार करता येईल. ‘आयुष्मान भारत गोल्ड कार्ड सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये लाभार्थी उपचार घेऊ शकतात. जास्तीत जास्त नागरिकांनी या विशेष मोहिमेत सहभाग नोंदवून स्वतःचे व आपल्या कुटुंबीयांचे कार्ड त्वरित काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शासनाने हे कार्ड बनविण्याची प्रक्रिया आता सुलभ केली असून, नागरिकांना गुगल प्ले स्टोअरवरील ‘आयुष्मान अप’ डाउनलोड करून किंवा

https://beneficiary.nha.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन स्वतःच ‘आयुष्मान भारत गोल्ड कार्ड’ तयार करता येईल.

संबंधित पोस्ट

राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या देदिप्यमान यशाचं प्रतिबिंब आगामी महापालिका निवडणुकीतही उमटेल असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार .

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मोठ्या प्रमाणावर राबवा- सीईओ मिन्नू पी.एम.*ग्राम पंचायतींना लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय कन्नड यांना विभागस्तरीय पारितोषिक जाहीर

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर – राज्यपाल आचार्य देवव्रत मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन

पोलीस पाटलांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे : पालकमंत्री जयकुमार रावल जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

नियमांचे काटेकोर पालन करून बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निर्देश..