vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

दत्त माहात्म्य

         –  दत्त माहात्म्य –

 

अध्यात्मिक वार्ता-

गुरुचरित्रात परान्न दोष सांगितले आहेत , त्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन आपण परान्न टाळावयास हवे पण सध्या हे बऱ्याचदा शक्य होत नाही. कोणाकडे अन्नग्रहण करावे आणि कोणाकडे करू नये याचे काटेकोर नियम गुरुचरित्रात सांगितले आहेत. अन्न हे दोष अथवा वासना वहनाचे कार्य करते आणि याची प्रचिती नेहेमी येते . सांप्रत काळात परान्न हा भाग कोणी पाळत नसले तरी त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतात. का असं सांगितलं असेल ? कोणाकडे केवळ जेवण्याने असा काय तोटा किंवा नुकसान होते ?? कैक उदाहरणे यादाखल देता येतील. नकारात्मक आणि सकारात्मक देखील.

थोरल्या महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे . ब्रह्मावर्तास आप्पा खाडिलकर नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला एकदा रक्ताची हगवण सुरु होऊन तो फार अशक्त झाला. त्या वेळी त्याच्या आईला कोणीतरी असा उपाय सांगितला कि तुम्ही पंचपक्वांन्ने तयार करून ते अन्न मुलावरून उतरून कोणास तरी खायला घाला म्हणजे मुलगा बरा होईल. हे ऐकून आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटराव नावाच्या मनुष्यास बोलावून जेऊ घातले. याने आप्पाला बरे वाटले तर व्यंकटरावला तो आप्पाचा रोग जडला आणि तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला. थोरले महाराज त्यावेळी ब्रह्मावर्तास होते ,त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यावर ते म्हणाले तू उतारा खाल्ल्यामुळे तुझी हि अवस्था झाली आहे . तू यातून बरा होशील असे दिसत नाही . यानंतर व्यंकटरावाने बरेच औषधोपचार केले पण स्वामी महाराज एकदा जे म्हणाले ते ब्रह्मवाक्य . शेवटी काही दिवसात त्याचे दम्याने देहावसान झाले .हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम.

दत्त माहात्म्यात विष्णुदत्त ब्राह्मणाच्या घरी जडमूढ असा पुत्र जेवला तेव्हा ,सतीचे हाताने मिळता अन्न l तयाचा भ्रम गेला निघोन ll असे म्हटले आहे . हा अन्नाचा सकारात्मक परिणाम.

प्रत्यक्ष दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाकडे भोजनाकरीत आले होते ,दत्त महाराजांना आग्रहाने जेऊ वाढल्याचे फळ हे मोक्षस्वरूप होते ,यापेक्षा अधिक कोणते फळ असेल ??? आलेल्या अतिथीला आनंदाने केलेले अन्नदान हे आपल्या पापनिष्कृतिकरिता उपयुक्त ठरते . श्री गुरुदेव दत्त !!! –
अभय आचार्य

संबंधित पोस्ट

26 व 27 जून रोजी जिल्हा दक्षता समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा

श्री स्वामी समर्थ महाराज. गोसाव्याची मनोकामना. (स्वामींच्या लीला )

vishwatmaklokswamivarta

भाव 2025- कला आणि संस्कृतीचामकाकुंभ*भारताच्या वर्षातील सर्वात मोठ्या कला आणि सांस्कृतिक संमेलनाविषयी तुम्हाला माहिती असण्याची 10 तथ्ये*_

vishwatmaklokswamivarta

अडथळे दूर करून, बंध मजबूत करून: महिलांच्या कल्याणासाठी संवाद जागवणारा 10 वी आंतरराष्ट्रीय महिला परिषद..

vishwatmaklokswamivarta

श्री दुर्गा सप्तशती नवचंडी याग

vishwatmaklokswamivarta

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लेख ……गुरुपौर्णिमेचे महत्त्व ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥