vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

प्रत्येकाने गुरु केलाच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप श्रीहरी रसाळ महाराज यांचे आज हरिकिर्तन

प्रत्येकाने गुरु केलाच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप श्रीहरी रसाळ महाराज यांचे आज हरिकिर्तन

जालना/प्रतिनिधी-आपल्या जीवनात गुरुला अनन्य साधारण महत्व असून आपल्या जीवनात गुरु असलाच पाहिजे. नव्हे तर तो आपण केला पाहिजे, असा हितोपदेश हभप राहुल महाराज जोशी यांनी येथे बोलतांना दिला.

श्री. जोशी महाराज सहकार बँक कॉलनीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या भागवत कथेचे चौथे पुष्प गुफतांना बोलत होते. यावेळी संस्थानचे सचिव संपतराव पाटील, शिरिष सांगोळे, हभप तुकाराम महाराज मुंढे, हभप आत्माराम महाराज बिडवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलतांना जोशी महाराज म्हणाले की, लग्न जुळतांना पत्रिका जरी जुळली तरी गुरु जुळत नसल्यामुळे लग्न मोडल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. गुरु चांगला असेल तर आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही. त्यामुळे आपल्या जीवनात गुरुला अनन्य साधारण असे महत्व असल्याचेही जोशी महाराज म्हणाले.

दरम्यान, किर्तन सेवेत श्री हभप दिनेश महाराज उंडे यांनी, सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला। नाही तरी गेला, जन्म वाया॥ ह्या तुकाराम महाराजांच्याा अभंगावर निरुपन केले. ते म्हणाले की, जो विठ्ठला भजतो तोच या जगात तारल्या जातो. अन्यथा नाही. म्हणून प्रत्येक जीवाने विठ्ठल नाम घेतले पाहिजे, त्याला आपला जीव ओवाळून टाकला पाहिजे, तरच अशा जीवाचे भले आहे. अन्यथा नाही.

संबंधित पोस्ट

शिवालयातील प्रदक्षिणा ..

श्री दुर्गा सप्तशती नवचंडी याग

vishwatmaklokswamivarta

नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि  महत्त्व…

vishwatmaklokswamivarta

*💐🙏प्रभात पुष्प🙏🌹

आरती संग्रह*…. *श्री गणपतीची आरती*  

मकर संक्रांत 2023 माहिती महत्व, शुभ मुहूर्त व पौराणिक कथा

vishwatmaklokswamivarta