vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

प्रत्येकाने गुरु केलाच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप श्रीहरी रसाळ महाराज यांचे आज हरिकिर्तन

प्रत्येकाने गुरु केलाच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप श्रीहरी रसाळ महाराज यांचे आज हरिकिर्तन

जालना/प्रतिनिधी-आपल्या जीवनात गुरुला अनन्य साधारण महत्व असून आपल्या जीवनात गुरु असलाच पाहिजे. नव्हे तर तो आपण केला पाहिजे, असा हितोपदेश हभप राहुल महाराज जोशी यांनी येथे बोलतांना दिला.

श्री. जोशी महाराज सहकार बँक कॉलनीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या भागवत कथेचे चौथे पुष्प गुफतांना बोलत होते. यावेळी संस्थानचे सचिव संपतराव पाटील, शिरिष सांगोळे, हभप तुकाराम महाराज मुंढे, हभप आत्माराम महाराज बिडवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलतांना जोशी महाराज म्हणाले की, लग्न जुळतांना पत्रिका जरी जुळली तरी गुरु जुळत नसल्यामुळे लग्न मोडल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. गुरु चांगला असेल तर आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही. त्यामुळे आपल्या जीवनात गुरुला अनन्य साधारण असे महत्व असल्याचेही जोशी महाराज म्हणाले.

दरम्यान, किर्तन सेवेत श्री हभप दिनेश महाराज उंडे यांनी, सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला। नाही तरी गेला, जन्म वाया॥ ह्या तुकाराम महाराजांच्याा अभंगावर निरुपन केले. ते म्हणाले की, जो विठ्ठला भजतो तोच या जगात तारल्या जातो. अन्यथा नाही. म्हणून प्रत्येक जीवाने विठ्ठल नाम घेतले पाहिजे, त्याला आपला जीव ओवाळून टाकला पाहिजे, तरच अशा जीवाचे भले आहे. अन्यथा नाही.

संबंधित पोस्ट

🔆🕉🔆⚜🚩   🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻    आनंदयात्रींच्या पंढरी वारीच्या सज्जतेची 🚩 आज श्रीक्षेत्र देहू नगरीतून…

vishwatmaklokswamivarta

हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाआरोग्य शिबिर- संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा २०२५-

vishwatmaklokswamivarta

देशाच्या स्वातंत्र्यदिना बरोबर निरंकारी मिशनने साजरे केलेआत्मिक जागृतीचे पावन पर्व : मुक्ती पर्व भक्तीमध्ये स्वातंत्र्याची मुक्ती- निरंकारी राजपिता रमितजी

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन.

vishwatmaklokswamivarta

आध्यात्मिक मार्गात अडथळे का येतात?