vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक हतबल,भास्कर आबा दानवे यांनी तातडीने मदतीसाठी मागणी केली

मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक हतबल,भास्कर आबा दानवे यांनी तातडीने मदतीसाठी मागणी केली

जालना, (प्रतिनिधी) – जालना शहर व परिसरातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि ढग फुटीमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतमाल नष्ट झाला, घरांची पडझड झाली, जनावरांचे प्राण गेले तसेच रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः रात्री बारा वाजल्यापासून सुरू झालेल्या ढग फुटीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान अधिकच वाढले आहे. अनेक पूल वाहून गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जालना शहरातील सुमारे ८० टक्के भागात पाणी घरांत शिरले असून, काही ठिकाणी तीन फूटांहून अधिक पाणी घरांत भरले आहे. नागरिकांच्या घरांत सापसारखे प्राणी आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी या परिस्थितीवर तात्काळ लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यांनी पत्रात मागणी केली आहे की, जालना शहर व ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांसाठी तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच, पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांसाठी तात्पुरती निवासव्यवस्था आणि आर्थिक मदत जाहीर करावी.

या आपत्तीमुळे शेतकरी व नागरिक हतबल झाले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य ती मदत करावी असे हि त्यांनी पत्राद्वारे सांगितले आहे

संबंधित पोस्ट

उद्योग प्रतिनिधींची बैठक -सामाजिक उत्तरदायित्व निधीची माहिती सादर करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम – शहराच्या अंतर्गत भागातही मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता..

सातारा येथील चतुर्थ मंदिर परिषदेसाठी राज्यभरातून ११०० हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती !*हिंदूंच्या प्रथा-परंपरा कुणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तर सरकार कठोर कारवाई करेल* *मंदिरे आणि गडकिल्ले यांवरील मंदिरांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रसंगी ‘बुलडोझर’ कारवाई !**मंदिरांच्या सर्व समस्यांसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू ! -* भरतशेठ गोगावले, फलोत्पादन आणि रोजगार हमीमंत्री

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ११ तूर खरेदी केंद्र कार्यान्वित

vishwatmaklokswamivarta

खते, बियाणे, कीटकनाशकांची तपासणी करा-अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई कर     – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta