vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा

राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा

मुंबई, प्रतिनिधी : लोकांच्या आणि जगाच्या कल्याणासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेखाली राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ २३ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचण्यात आला. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे सचिव, डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालक, डॉ. कादंबरी बलकवडे, तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते
दिनानिमित्त पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि राष्ट्रीय आयुष अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद वनस्पती माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून क्यूआर कोड स्कॅन केल्यावर त्या वनस्पतीची माहिती मोबाइलवर उपलब्ध होत होती.
राज्यातील सर्व आरोग्य आणि आयुष संस्था, एकात्मिक आयुष रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिरे (आयुष) आणि आयुर्वेद दवाखान्यांमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. आयुर्वेद व्याख्यान, निबंध आणि चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण, आणि ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अंतर्गत आयुष शिबिरे व योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

000

संबंधित पोस्ट

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर बैठकीत सविस्तर चर्चा  धर्मनिरपेक्षता व शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा महत्त्वाचा : अरविंद चव्हाण 

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी करुन आपला ओळख क्रमांक प्राप्त करावा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सेवाभाव, समर्पण आणि मानवतेचा दिव्य उत्सव78व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचा शुभारंभ मुंबई व महाराष्ट्रातून हजारो सेवादार समालखाला रवानाआत्ममंथन करून मनामध्ये व्याप्त दुर्गुण दूर करा- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज..

vishwatmaklokswamivarta