vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा

राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा

मुंबई, प्रतिनिधी : लोकांच्या आणि जगाच्या कल्याणासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेखाली राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ २३ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचण्यात आला. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे सचिव, डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालक, डॉ. कादंबरी बलकवडे, तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते
दिनानिमित्त पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि राष्ट्रीय आयुष अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद वनस्पती माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून क्यूआर कोड स्कॅन केल्यावर त्या वनस्पतीची माहिती मोबाइलवर उपलब्ध होत होती.
राज्यातील सर्व आरोग्य आणि आयुष संस्था, एकात्मिक आयुष रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिरे (आयुष) आणि आयुर्वेद दवाखान्यांमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. आयुर्वेद व्याख्यान, निबंध आणि चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण, आणि ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अंतर्गत आयुष शिबिरे व योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ कार्यक्रमाचे अनावरण

vishwatmaklokswamivarta

विचारवेध’मध्ये 3 जुलै रोजी ऐरोलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात श्री.अविनाश धर्माधिकारी करणार राजर्षी शाहू महाराजांना वैचारिक अभिवादन

नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये जागतिक जल दिन उत्साहात साजरा,पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली जलरक्षक शपथ..

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

शिर्डी: साईबाबा मंदिर परिसरात खाद्य विक्रेत्या महिलेची चाकूने हत्या; दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

महिलांचा कायदा व प्रशासनावर विश्वास वाढविणे महत्वाचे; अशा उपक्रमांमुळे महिलांना न्याय मिळण्यास मोठी मदत होईल – विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई येथे 28 प्रकरणांवर सुनावणी पूर्ण