vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यत रास्तभाव धान्य दुकानातुन धान्य उचल करावी

लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यत रास्तभाव धान्य दुकानातुन धान्य उचल करावी

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रास्तभाव धान्य दुकानातून धान्य वाटप करण्यात येते. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी दि.20 ऑक्टोबर 2025 पर्यंत रास्त भाव धान्य दुकानातुन धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी केले आहे.

 तसेच या कालावधीत ई-केवायसी (e-KYC) न केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांचे दुकानदाराने मशीनवर अंगठा घेऊन ई-केवायसीचे काम पूर्ण करुन घ्यावे, याबाबत कोणतीही कुचराई करुन नये. ही लाभार्थ्यांना शेवटची संधी असून ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात येईल.

ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी दुकानदाराकडे धान्य घेताना ई-केवायसी करुन घ्यावी. तसेच पात्र लाभार्थ्यांनी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दि.20 ऑक्टोबर 2025 पर्यंत दुकानातून धान्याची उचल करावी. पुरवठा यंत्रणेने सर्व रास्तभाव दुकाने चालू राहतील याची दक्षता घ्यावी व सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांनी या कालावधीत दुकाने चालू ठेवून लाभार्थ्यांना 100 टक्के धान्याचे वाटप करावे.

0000000

संबंधित पोस्ट

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय  च्या प्रमुख राजयोगिनी  दादी रतनमोहिनीयांचे निधन झाले आहे, त्या 101 वर्षांच्या होत्या. 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले पुणे जिल्ह्यातील दोन सुपुत्र – कौस्तुभ गानबोटे व संतोष जगदाळे या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी खाजगी अकादमींनी 6 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

vishwatmaklokswamivarta

श्री संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या मार्गदर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्णकलशारोहण समारंभ

vishwatmaklokswamivarta

राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी- अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक परिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार

महाराष्ट्र ‘एनएसएस’च्या 12 स्वयंसेवकांचा-कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव

vishwatmaklokswamivarta