vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे;- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील· नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी…

बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे;- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील· नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी…

मुंबई, प्रतिनिधी : बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कार्यान्वयनाची जबाबदारी आता कुळगाव बदलापूर नगरपरिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभागाने जारी केला असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

नगरविकास विभागाने यापूर्वी २३ मे २०२५ रोजी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. त्यानुसार प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निर्णयानुसार, “कुळगाव बदलापूर नगरपरिषद” यांच्याऐवजी “महाराष्ट्र जीवन प्राधिकरण” ही कार्यान्वयन संस्था म्हणून काम पाहणार आहे. तसेच प्रकल्पातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

 शासन निर्णयानुसार, या बदलामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळेल आणि बदलापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सुदृढ होईल, असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मनुष्यबळाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे राज्य निवडणूक आयोगाने केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरातील भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, हर्षीलमधील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट—-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी-स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा; संयुक्त मुख्यपरीक्षा रविवारी (दि.२९)

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे आठ दिवसात पंचनामे करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत दिले निर्देश – महसूल, ग्रामविकास, कृषि विभागाने बांधावर जावून संयुक्त पंचनामे करावेत- नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी जमा होण्यासाठी कार्यवाही करावी- गृहोपयोगी साहित्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करणार

31 मार्चला कोरडा दिवस जाहीर