vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न अन्नकूट प्रसाद ही केवळ परंपरा नाही, ती भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे ही परंपरा पुढील पिढ्यांनी जपली जावी – जिल्हाध्यक्ष, भास्कर आबा दानवे

प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न अन्नकूट प्रसाद ही केवळ परंपरा नाही, ती भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे ही परंपरा पुढील पिढ्यांनी जपली जावी – जिल्हाध्यक्ष, भास्कर आबा दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : जालना शहरातील प्रभाग क्र. १ मधील प्रियदर्शन कॉलनी येथे असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरात मागील ३५ वर्षांपासून चालत आलेली अन्नकूट प्रसादाची परंपरा यंदाही भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या स्वयंप्रेरणेने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही अन्नकूट प्रसाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी उपस्थित राहून महाआरती केली आणि भक्तांसोबत प्रसादाचा लाभ घेतला.

भास्कर आबा दानवे बोलताना म्हणाले की, “प्रियदर्शनी कॉलनीतील संकटमोचन हनुमान मंदिरात गेली अनेक वर्षे भक्तिभावाने अन्नकूट प्रसादाची परंपरा जपली जाते. ही परंपरा ही केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. अशी संस्कारमूल्ये पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी यावेळी आयोजक मंडळाचे कौतुक करत ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत कायम ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, कल्याण भदनेकर, प्रभागातील दिलीप शर्मा, अजित मानधनी, कैलास अग्रवाल, पालवे सर, शिवम यादव, किशोर आगलावे यांसह महिलांमध्ये शारदा काबरा, कमल मंत्री, मंगला मानेगावकर, मीना मित्तल, शोभा अग्रवाल आदींची उपस्थिती होती.अन्नकूट प्रसादासाठी परिसरातील नागरिक, महिला, युवक, बालक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. संपूर्ण परिसरात “जय हनुमान” च्या घोषणांनी धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित पोस्ट

गोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठीआंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या-पर्यटन मंत्री शंभुराज देसाई

vishwatmaklokswamivarta

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ जून सायंकाळपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेतील प्रत्येक तक्रार दूर करणार -शालेय शिक्षण विभाग

जिल्हा युवा महोत्सव उत्साहात संपन्न 

vishwatmaklokswamivarta

वनवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करावा*- *वनमंत्री गणेश नाईक*

छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमअन्वये कार्यशाळा उत्साहात

vishwatmaklokswamivarta