vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभासाठी शुक्रवारी उत्पादक खरेदीदार संमेलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे

शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभासाठी शुक्रवारी उत्पादक खरेदीदार संमेलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे

        सांगली, प्रतिनिधी : शेतकऱ्यांना हमखास व स्थिर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध व्हावी, स्थानिक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभ घेता यावा, तसेच जिल्ह्यातील कृषी उद्योगास व निर्यातीस चालना मिळण्यासाठी सांगली येथे शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उत्पादक खरेदीदार (बायर-सेलर मीट) संमेलन घेण्यात येणार आहे. हे संमेलन दीपायन बँक्वेट हॉल, जुने आरटीओ ऑफिस समोर, माधवनगर रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.

       जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, या उत्पादक खरेदीदार संमेलनामध्ये 100 पेक्षा जास्त खरेदीदार सहभाग घेणार आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला या माध्यमातून नवीन बाजारपेठ निर्माण होणार आहे. या संमेलनात बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी व इतर तृणधान्य प्रक्रिया केलेली उत्पादने यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

    जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील काही भाग पूर्वी दुष्काळी होता. परंतु, आता ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ या उपसा जलसिंचन योजनांमुळे पूर्णपणे बागायत झालेला आहे. शेतक‌ऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून आता सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, केळी या फळपिकांचे उत्पादन करण्यात येते व देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यात येते. विशेषतः द्राक्ष व बेदाणा निर्यातीसाठी सांगली जिल्ह्याची विशेष ओळख आहे. या फळपिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे या नवीन बाजारपेठांची ओळख शेतकऱ्यांना होण्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

00000

संबंधित पोस्ट

घणसोली विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेत 15 हजार दंड वसूली व 30 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त…

vishwatmaklokswamivarta

नवीन पिढीपुढे एक आदर्श-अल रेहान -उद्योजक जगतातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व शहबाज भाई

नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच

जम्मू कश्मीरच्या भद्रवाह – चंबा मार्गावर खोल दरीत वाहन कोसळून झालेल्या अपघातात १० जवानांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे;- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील· नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी…

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी व पूर आपत्ती बाधितांना विशेष मदत पॅकेज, सवलती लागू बुलढाणा जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश  शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करावी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta