vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऐतिहासिक घटना: भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म

ऐतिहासिक घटना: भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म

नवी दिल्ली प्रतिनिधी-

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत एक मोठी आणि ऐतिहासिक घटना जाहीर केली आहे.

एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करताना त्यांनी सांगितले की मुखी या भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता, जिचे वय 2 वर्षे 9 महिने आहे तिने 5 शावकांना जन्म दिला आहे. भारताच्या ‘चित्ता पुनर्वसन प्रकल्पामधील हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.

यादव यांनी सांगितलं की अलीकडच्या इतिहासात भारतात जन्मलेल्या चित्ता मादीने यशस्वीरीत्या शावकांना जन्म देण्याची ही पहिलीच घटना आहे. चित्त्यांची भारतीय वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता, आरोग्य आणि दीर्घकालीन अस्तित्वाची मजबूत शक्यता ही घटना दर्शवते.

यादव म्हणाले,“ही घटना भारतात टिकून राहणाऱ्या आणि जनुकीयदृष्ट्या वैविध्य असलेल्या चित्यांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक बळकट करते.त्यांनी पुढे सांगितलं की मुखी आणि तिची सर्व शावके व्यवस्थित आहेत.

यादव यांनी समाधान व्यक्त करत सांगितलं की या यशामुळे भारताचे सध्याचे संवर्धन प्रयत्न आणि प्रोजेक्ट चित्ताचा पुढचा मार्ग आणखी आशादायी दिसत आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्य शासनाचे पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वोत्तम काम बँकांसाठी आश्वासक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा विकासासाठी बँकांकडून नेहमीच सर्वोत्तम सहकार्य..

मी सॅम डिसुझा नाही, माझ्या प्रोफाईचा चुकीचा वापर, पालघर पोलिसांत प्रभाकर साईलविरोधात तक्रार दाखल…

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत कार्यवाही..

vishwatmaklokswamivarta

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरिता 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी अंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण 9 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 30 सप्टेंबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

पैठण व फुलंब्री मतदारसंघनिहाय प्रशिक्षणनिवडणूक कामकाज करण्याची संधी ही अभिमानाची बाब- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी