vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

 

सांगली, प्रतिनिधी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरीता अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दि. 31 डिसेंबर 2025 अखेर पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याचे समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 26 डिसेंबर 2024 रोजीच्या च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची नव्याने अंमलबजावणी करण्यात येत असून योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलव्दारे दि. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. आता, विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र, ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी इत्यादी कारणामुळे विविध विद्यार्थी संघटना, पालक, विद्यार्थी यांच्याकडून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत वरीष्ठ कार्यालयास मागणी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगपालिका हद्दीतील व हद्दीपासनु 05 कि.मी. च्या परीसरातील तसेच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयामधील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील इ. 11 वी, 12 वी तसेच इ.12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org किंवा MahaIT या पोर्टलवरती त्वरीत अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालय, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली व आपल्या तालुक्यातील गृहपाल, मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहामध्ये संपर्क साधावा, असे अवाहन सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पुर्णा मध्यम प्रकल्प ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी सात पाणीपाळ्या प्रस्तावितशेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुणे, खडकी, औरंगाबाद, देवळाली, अहमदनगर, कामटी कटकमंडळांचे महापालिकांमध्ये विलिनीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटकमंडळ क्षेत्रात मिळणार नागरीसुविधांचा लाभ

पाणीटंचाई निवारणासाठी मोताळा तालुक्यातील 15 गावांमध्ये 20 विंधण विहिरींना मंजुरी

खारघर येथे होणाऱ्या हिंद दी चादर कार्यक्रमाला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था-नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

28 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta