vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य वाटप 

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य वाटप

कल्याण प्रतिनिधी-

 कल्याणच्या श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट तर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजूं या योजनेचा लाभ घेत असतात महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते आधारवाडी च्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात.

 शुक्रवार दि.२६/१२/ २०२५, रोजी सकाळी ११.३० वाजता झालेल्या या उपक्रमात संस्थेचे ट्रस्टी विनयभाई माधवजीभाई तन्ना ह्याचे दिनांक २३/१२/२०२५ रोजी निधन झाले आहे . त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांचे कुटुंबीयां तर्फे गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वितरण करुन तन्ना यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ह्या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री जसूभाई चंदाराणा, विष्णूकुमार चौधरी, दिनेश भाई तन्ना,दिपकभाई तन्ना,कन्नैयाभाई तन्ना,भिखूभाई कारीया, जयेश भाई कारीया,राजीव चंदाराणा, तुषारभाई दाणी,दयालभाई सजनानी, मोनिश चंदाराणा आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य वितरण करण्यात आले

ह्या ट्रस्ट चे संचालक ह्यांनी आव्हान केले आहे की ज्या कोणाला ह्या अन्न क्षेत्राचे सेवाकार्या मध्ये सहयोग करायचे असेल तर आपल्या वाढदिवसाच्या किंवा आपल्या पितृच्या पूण्यतिथी आणी घराचे चांगले प्रसंगी ह्या ट्रस्टला दान देवून आपण सहकार्य करावे. ह्या साठी

संचालक-श्री. जसुभाई चऺदाराणा-(मो.9320301501), श्री.छबीलभाई कारीया – (मो.9322403819) ह्यांना संपर्क करावा.

संबंधित पोस्ट

डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षण

vishwatmaklokswamivarta

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025’चेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (रिहॅब) ने होळीच्या रंगांनी पसरवल्या रुग्णांसाठी आनंदाच्या छटा…

शीख बांधवाना विवाह नोंदणी करण्याचे आवाहन

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस