vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य वाटप 

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य वाटप

कल्याण प्रतिनिधी-

 कल्याणच्या श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट तर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजूं या योजनेचा लाभ घेत असतात महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते आधारवाडी च्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात.

 शुक्रवार दि.२६/१२/ २०२५, रोजी सकाळी ११.३० वाजता झालेल्या या उपक्रमात संस्थेचे ट्रस्टी विनयभाई माधवजीभाई तन्ना ह्याचे दिनांक २३/१२/२०२५ रोजी निधन झाले आहे . त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांचे कुटुंबीयां तर्फे गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वितरण करुन तन्ना यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ह्या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री जसूभाई चंदाराणा, विष्णूकुमार चौधरी, दिनेश भाई तन्ना,दिपकभाई तन्ना,कन्नैयाभाई तन्ना,भिखूभाई कारीया, जयेश भाई कारीया,राजीव चंदाराणा, तुषारभाई दाणी,दयालभाई सजनानी, मोनिश चंदाराणा आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य वितरण करण्यात आले

ह्या ट्रस्ट चे संचालक ह्यांनी आव्हान केले आहे की ज्या कोणाला ह्या अन्न क्षेत्राचे सेवाकार्या मध्ये सहयोग करायचे असेल तर आपल्या वाढदिवसाच्या किंवा आपल्या पितृच्या पूण्यतिथी आणी घराचे चांगले प्रसंगी ह्या ट्रस्टला दान देवून आपण सहकार्य करावे. ह्या साठी

संचालक-श्री. जसुभाई चऺदाराणा-(मो.9320301501), श्री.छबीलभाई कारीया – (मो.9322403819) ह्यांना संपर्क करावा.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण..

राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलचे तसेच ‘आला रे आला… राज्य महोत्सव आला…’ या गीताचे लोकार्पण

प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक आढावा बैठक.

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन

पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !मानवी साखळीद्वारे प्रबोधन करत खडकवासला जलाशयाचे २२ व्या वर्षीही होणारे प्रदूषण रोखण्यात १०० टक्के यश !