श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य वाटप
कल्याण प्रतिनिधी-
कल्याणच्या श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट तर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजूं या योजनेचा लाभ घेत असतात महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते आधारवाडी च्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात.
शुक्रवार दि.२६/१२/ २०२५, रोजी सकाळी ११.३० वाजता झालेल्या या उपक्रमात संस्थेचे ट्रस्टी विनयभाई माधवजीभाई तन्ना ह्याचे दिनांक २३/१२/२०२५ रोजी निधन झाले आहे . त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांचे कुटुंबीयां तर्फे गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वितरण करुन तन्ना यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ह्या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री जसूभाई चंदाराणा, विष्णूकुमार चौधरी, दिनेश भाई तन्ना,दिपकभाई तन्ना,कन्नैयाभाई तन्ना,भिखूभाई कारीया, जयेश भाई कारीया,राजीव चंदाराणा, तुषारभाई दाणी,दयालभाई सजनानी, मोनिश चंदाराणा आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य वितरण करण्यात आले
ह्या ट्रस्ट चे संचालक ह्यांनी आव्हान केले आहे की ज्या कोणाला ह्या अन्न क्षेत्राचे सेवाकार्या मध्ये सहयोग करायचे असेल तर आपल्या वाढदिवसाच्या किंवा आपल्या पितृच्या पूण्यतिथी आणी घराचे चांगले प्रसंगी ह्या ट्रस्टला दान देवून आपण सहकार्य करावे. ह्या साठी