vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ऐतिहासिक #सातारा नगरीत साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ

ऐतिहासिक #सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ

राज्य प्रतिनिधी 📍 सातारा

ऐतिहासिक #सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ (शाहू क्रीडा संकुल) येथे ध्वजारोहणाच्या मंगल सोहळ्याने या साहित्यकुंभाचा दिमाखदार शुभारंभ झाला.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा-शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे १ ते ४ जानेवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या ऐतिहासिक प्रसंगी ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाहक सुनीताराजे पवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, ज्येष्ठ उद्योजक भालचंद्र जोशी, संदीप शहा, रवींद्र बेडकीहाळ यांसह अनेक साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीने महाराष्ट्र राज्याची संस्कृती परंपरा संत वाङ्ममय आणि साहित्य यांच्या आठवणी निश्चितपणे जागवल्या.

#अखिलभारतीयमराठीसाहित्यसंमेलन

संबंधित पोस्ट

धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· स्थानिक कारागिरांच्या पुर्नवसनाला सर्वोच्च प्राधान्य· धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजूरी..

पुणे येथे 4, 18 एप्रिल आणि 2 मे रोजी महसूल अदालत

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातूनयुवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानाचे उद्घाटन,- अमली पदार्थ प्रतिबंधविषयक होणार जनजागृती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना- 18 जुलैपर्यंत चालणार अभियान

vishwatmaklokswamivarta

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत करावी – आमदार विलास तरे# कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देऊन जोरदार मागणी

vishwatmaklokswamivarta

या दिवाळीत प्रियजनांना भेट द्या फास्टटॅगचा वार्षिक पास

vishwatmaklokswamivarta