vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- मा.मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड राजेंद्र सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली “न्याय आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.02 मार्च ते दि.30 मार्च 2026 या कालावधीत संपूर्ण रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत कार्यरत राहणार असून विविध तालुक्यांमध्ये जाऊन प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा तसेच नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ दि. 02 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता रायगड जिल्हा न्यायालय, अलिबाग येथे एस. आर. तिवारी, जिल्हा न्यायाधीश-2 यांच्या हस्ते संपन्न झाला.

या फिरत्या लोक अदालतीसाठी श्रीकांत उपाध्ये (निवृत्त न्यायाधीश) यांची कक्ष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश 3 रायगड अलिबाग एस.डी. भगत तसेच न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे तसेच अलिबाग वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष ए.डी.पाटील व सचिव अमित देशमुख आणि सर्व न्यायिक अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग उपस्थित होते

ही फिरती लोक अदालत दि. 30 मार्च 2026 पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जाऊन लोक अदालत आयोजित करणार असून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग राजेंद्र द.सावंत यांनी केले आहे. न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांना जलद सुलभ व विनामूल्य न्याय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देश या उपक्रमामध्ये आहे.

0000000

संबंधित पोस्ट

देशभरात ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनचे आयोजन– केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया

vishwatmaklokswamivarta

शिराळा, चांदोलीसाठी सर्वसमावेशक पर्यटन आराखडा तयार करा  – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोक अदालतीत ४ हजार ३६१ प्रकरणांचा निपटारा१९.१७ कोटींची तडजोड रक्कम वसूल..

विधान परिषद लक्षवेधी-धर्मांतर करून मिळविलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” योजनेचा लाभ घेण्यासाठी मातंग समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीना दि.20 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सर्व भारतीयांचं स्वप्नं पूर्ण करणारा अर्थसंकल्प- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta