vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- मा.मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड राजेंद्र सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली “न्याय आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.02 मार्च ते दि.30 मार्च 2026 या कालावधीत संपूर्ण रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत कार्यरत राहणार असून विविध तालुक्यांमध्ये जाऊन प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा तसेच नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ दि. 02 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता रायगड जिल्हा न्यायालय, अलिबाग येथे एस. आर. तिवारी, जिल्हा न्यायाधीश-2 यांच्या हस्ते संपन्न झाला.

या फिरत्या लोक अदालतीसाठी श्रीकांत उपाध्ये (निवृत्त न्यायाधीश) यांची कक्ष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश 3 रायगड अलिबाग एस.डी. भगत तसेच न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे तसेच अलिबाग वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष ए.डी.पाटील व सचिव अमित देशमुख आणि सर्व न्यायिक अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग उपस्थित होते

ही फिरती लोक अदालत दि. 30 मार्च 2026 पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जाऊन लोक अदालत आयोजित करणार असून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग राजेंद्र द.सावंत यांनी केले आहे. न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांना जलद सुलभ व विनामूल्य न्याय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देश या उपक्रमामध्ये आहे.

0000000

संबंधित पोस्ट

रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार जेट्टी उभारावी- मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

जारीदासह परिसरातील ५० गावांसाठी खात्रिशीर विजेची सोय झाल्याने मेळघाटातील आदीवासी बांधव आणि महावितरणकडून मा. सरन्यायाधिश भुषण गवई यांचे आभार

vishwatmaklokswamivarta

जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक :डॉ संग्राम काळे*

vishwatmaklokswamivarta

मोघरपाडा कारशेड जागेसंदर्भात आगरी/ कोळी बांधवाच्या विकासाच्या दृष्टीने कुणावरही अन्याय होणार नाही   – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती रॅली कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

स्मारकाच्या माध्यमातून नटसम्राट बालगंधर्वांच्या सांस्कृतिक ठशाचे जतन  – जिल्हाधिकारी अशोक काकडे,नागठाणेच्या बालगंधर्व स्मारक कामाची केली पाहणी..

vishwatmaklokswamivarta