vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात दि. 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान साजरा होणार “जलमहोत्सव”

शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात दि. 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान साजरा होणार “जलमहोत्सव”

रायगड – अलिबाग, प्रतिनिधी – देशातील ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान ‘जल महोत्सव’ देशभर राबविण्यात येणार आहे.

पाणी ही केवळ पायाभूत सुविधांची बाब राहिलेली नाही तर ती सांस्कृतिक पद्धती म्हणुन पाण्याची जपणूक करावी. पाण्याच्या संवर्धाना साठी स्थानिक पंरपरा यांचा उपयोग मुख्यत: विचारात घ्यावेत. सदर जलमहोत्सवादरम्यान गावागावात पाणी तपासणीसाठी महिलांना प्रोत्साहन देणे, फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी करणे ,प्रत्येक गावात युवकांचा जल संवर्धनासाठी सहभाग घेण्यासाठी यंग बिग्रेडची स्थापना ,जिल्ह्यातील शाळांमध्ये जलसंवर्धनासाठी स्पर्धाचे आयोजन करणेत येणार आहेत. ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याच्या संवर्धानासाठी उपाययोजनांचा समावेश करणेत यावा. ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा आधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी दि. 8 ते 22 मार्च 2026 या कालावधीत जलमहोत्सव राबविला जाणार आहे अशी माहिती प्रकल्प संचालक जल जीवन मिशन श्रीम. शुभांगी नाखले यांनी दिली.

 गाव, पंचायत समिती स्तरावर लोक जल उत्सव आयोजित केला जाईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारीत असणार आहे.पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, स्थानिक जलउत्सव संस्थांत्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरूस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा जलमहोत्सवाच्या उपक्रमाचा उद्देश आहे,असे ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे यांनी सांगितले .

000

संबंधित पोस्ट

आषाढी एकादशी यात्रा: पूर्वतयारी आढावा बैठक भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV ची बारीक नजर पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये काम पुर्ण; उर्वरित शाळांमध्ये एप्रिल २०२६ अखेरपर्यंत शीघ्रतेने CCTV बसविणार…

आयुष मंत्रालय केंद्रीय आयुर्वेदिक संस्था तर्फे धारावी आरोग्य शिबिर संपन्न…

जन धन खातेधारकांसाठी ई-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांचीअंमलबजावणीसाठी बँक आपल्या गावात..

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर ! सावंतवाडी रोड स्थानकावर ३ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना नियमित थांबा मंजूर मध्य रेल्वे व कोकण रेल्वे प्रशासन कडून ‘गणेशोत्सव विशेष गाड्यां’ची घोषणा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना मोठे यश…

vishwatmaklokswamivarta

एसआयआर कार्यक्रमाचा केंद्रीय उप निवडणूक आयुक्तांकडून आढावा* *मतदार यादीची अचूकता, बीएलओच्या कामाचे नियमित परीक्षण आणि कालमर्यादेचे काटेकोर पालन करावे* – *उप निवडणूक आयुक्त ग्यानेश भारती*