vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळात नोंदणीचे आवाहन

65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळात नोंदणीचे आवाहन

 

जालना, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या वतीने 65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून, पात्र चालकांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन नोंदणी करावी. ही नोंदणी मोबाईलद्वारे घरबसल्या किंवा कोणत्याही सायबर कॅफेमधून करता येणार आहे. अर्ज भरताना काही अडचण आल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे

या योजनसाठी चालक हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा. तसेच त्याच्याकडे किमान पाच वर्षांपूर्वीचा परवाना असणे आवश्यक आहे. रिक्षा किंवा मीटर टॅक्सी चालवत असताना त्याच्याकडे कोणतेही चारचाकी वाहन नसावे, अशी अटही ठेवण्यात आली आहे.

या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालकांना सामाजिक सुरक्षा व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. 65 वर्षांवरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाणार असून, चालकांसाठी विमा व आरोग्य योजनाही राबविण्यात येणार आहेत.

तसेच चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार असून, कर्तव्यावर असताना चालकास दुखापत झाल्यास कल्याणकारी मंडळामार्फत आर्थिक सहाय्यही करण्यात येणार आहे. पात्र चालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जलयुक्त, समृद्ध महाराष्ट्र’ संकल्पनेला बुलढाण्यात बळ;टाटा ट्रस्ट-मानवलोकच्या उपक्रमातून शाश्वत शेतीला चालना..

जिल्ह्यातील विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत    –खासदार सुनिल तटकरे

खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १५ बोटी जिलेटिनद्वारे उध्वस्त,सिंदखेडराजा, बुलढाणा आणि जालन्यातील पथकाची संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर : कांदळवनांच्या संरक्षणासाठी किनारपट्टी नियमन समितीची बैठक घेणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत जलसंपदा विभागामार्फत कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण 

सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी २० हजार भाविकांची उपस्थित !**हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच !* – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था