vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळात नोंदणीचे आवाहन

65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळात नोंदणीचे आवाहन

 

जालना, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या वतीने 65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून, पात्र चालकांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन नोंदणी करावी. ही नोंदणी मोबाईलद्वारे घरबसल्या किंवा कोणत्याही सायबर कॅफेमधून करता येणार आहे. अर्ज भरताना काही अडचण आल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे

या योजनसाठी चालक हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा. तसेच त्याच्याकडे किमान पाच वर्षांपूर्वीचा परवाना असणे आवश्यक आहे. रिक्षा किंवा मीटर टॅक्सी चालवत असताना त्याच्याकडे कोणतेही चारचाकी वाहन नसावे, अशी अटही ठेवण्यात आली आहे.

या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालकांना सामाजिक सुरक्षा व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. 65 वर्षांवरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाणार असून, चालकांसाठी विमा व आरोग्य योजनाही राबविण्यात येणार आहेत.

तसेच चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार असून, कर्तव्यावर असताना चालकास दुखापत झाल्यास कल्याणकारी मंडळामार्फत आर्थिक सहाय्यही करण्यात येणार आहे. पात्र चालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार – वनमंत्री गणेश नाईक ‘संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजना’ (वाईल्डकॉन – 2025) परिषदेचा समारोप

vishwatmaklokswamivarta

फेरफार प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सुधारित कार्यपद्धती

पाथ्रीकर कॅम्पसमध्ये योगादिन साजरा

श्रीनारायण गुरूंच्या महासमाधी शताब्दी उत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन ,श्रीनारायण गुरूंचा एकतेचा संदेश आपल्याला आठवण करून देतो की सर्व मानवांमध्ये समान दिव्य तत्व आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू..

vishwatmaklokswamivarta

डिजीटल क्रॉप सर्वे अंतर्गत बदनापूर तालुक्याची पायलट प्रोजेक्टसाठी निवड

आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta