
मुंबई शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य प्रतिनिधी-#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
मुंबई शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी १२ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी अत्यंत कुशल आणि तत्पर तपास केला आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध असल्याचे समोर आले असून, त्यातील काही ऑपरेटिव्ह परदेशातून कार्यरत असल्याचेही निदर्शनास आले आहे. एका प्रमुख आरोपीच्या भावालाही अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी सध्या परदेशात असल्याने त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



