vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नांदेड परिसरातील पूर परिस्थितीमुळे नदीत गणपतीचे विसर्जन नको

नांदेड परिसरातील पूर परिस्थितीमुळे नदीत गणपतीचे विसर्जन नको

नांदेड – प्रतिनिधी   श्री गणेशाची विधीवत स्थापना झाली आहे. आता दीड, पाच, सात आणि दहा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन  करण्यात येणार आहे. मात्र, नदीकाठी असलेली पूरपरिस्थिती पाहता भाविकांनी नदीमध्ये श्री गणेशाचे विसर्जन करू नये. त्याऐवजी आपआपल्या घरी किंवा आपल्या परिसरातील श्री गणेश मंडळाकडे आपली गणेश मुर्ती विसर्जनासाठी द्यावी, असे आवाहन नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत महापालिकेचे (Nanded) अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिलेल्या पत्रकात आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने दरर्षीप्रमाणे विसर्जनाची तयारी करण्यात येत आहे.

शहरातील काही नागरिकांकडून दीड, पाच व सात दिवसांच्या कालावधीसाठी श्रींची स्थापना करण्यात येते व त्यानंतर गणेश मुर्तीचे विसर्जन गोदावरी किंवा आसना नदीत करण्यात येते. सद्य:स्थितीत गोदावरी आणि आसना नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून अशा वेळी श्री विसर्जनासाठी तसेच अन्य कारणाने नदीकाठी जाणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

समृद्धी मार्गावर वाहनांची विशेष तपासणी मोहीम *मद्यप्राशन केलेल्या वाहनचालकावर कारवाई

मुंबई लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक घटना :परीक्षेला जाणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत…

शेतकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांकडून विकासकामांची पाहणी

गर्भलिंगनिदानास प्रतिबंध ही आपलीसामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा

नव्या दिल्लीत शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. ‘दिल्ली चलो’ म्हणत पुन्हा एकदा त्यांनी मोर्चा ला सुरुवात.. पोलिसांची शंभू सीमेवर कडक सुरक्षा…

vishwatmaklokswamivarta