vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

 

अमरावती, प्रतिनिधी): अमरावती शहरात श्री क्षेत्र चांगापूर हनुमान मंदीर, चांगापूर अमरावती येथे दरवर्षी प्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भावीकांची गर्दी असते. दि. 02 एप्रिल 2026 गुरूवार, सकाळी 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.

सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग चांगापूर फाटा ते श्री हनुमान मंदीर चांगापूर हा मार्ग सर्व प्रकारच्या जड वाहनांकरीता प्रवेश बंदी राहील.वाहतूकीस पर्यायी मार्ग चांगापूर फाटा ते श्री हनुमान मंदीर चांगापूर रेल्वे अंडर बायपास या मार्गे फक्त दर्शनाकरीता जाणार दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रवेश राहील. हनुमान मंदीर चांगापूर येथे दर्शन घेवून परतणाऱ्या नागरिकांनी आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी मंदीरा पासून बाहेर निघणार मार्ग- अयोध्या नगरी ले-आऊट ते रेवसा फाटा या मार्गाचा अवलंब करावा. पार्कीग व्यवस्था- मंदीर परिसरात वाहन पार्कींग फलक लावले असल्या त्याच ठिकाणीच वाहन धारकांनी वाहने पार्क करावे.

वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्याच्या प्रगतीचा गौरवशाली टप्पा : ‘रायझिंग जालना’ कार्यक्रमाचे आयोजन  • जालना जिल्ह्याच्या 45 वर्षांच्या वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी, विकास        आगामी योजनांचे सादरीकरण • ‘गरजा महाराष्ट्र’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन • विविध विभागाचे 50 हून अधिक स्टॉल्स

लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन

राज्यात काही ठिकाणी पाऊस, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे 

सासवड-जेजुरी भुयारी गटार प्रकल्पांना निधी देणार- उद्योग मंत्री उदय सामंत

मिनी मंत्रालयाचा ३६ कोटीचा अर्थसंकल्प मंजूर• प्रगत तंत्रज्ञान सक्षम समाज व शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना…

निराधार योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा अव्वल !उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान…