vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवी मुंबई विमानतळावर राष्ट्रीय आपत्ती रंगीत तालीम

नवी मुंबई विमानतळावर राष्ट्रीय आपत्ती रंगीत तालीम

 

 रायगड- प्रतिनिधी:-आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सज्जता वाढविण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात दि. ९ एप्रिल २०२६ रोजी आपत्कालीन रंगीत तालीम (मॉक एक्सरसाइज) आयोजित करण्यात आली आहे. ही तालीम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे.

या रंगीत तालमीमध्ये विविध आपत्तीजन्य परिस्थितींचे प्रतिकात्मक सादरीकरण करून आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता तपासली जाणार आहे. विमान अपघात, आग, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आदी प्रसंगांवर तात्काळ आणि समन्वयाने कशी कार्यवाही केली जाते, याचा सराव करण्यात येणार आहे

यावेळी पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, आपत्कालीन सेवा यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांचा सक्रिय सहभाग राहणार असून, विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांनी या काळात कोणतीही अफवा पसरवू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

विजयी भव, दिव्या..!’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वचषक बुध्दीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दिव्या देशमुखला शुभेच्छा!

विकसित भारत-2047’ लक्ष्य साधण्यासाठी महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ घेऊन सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निती आयोगाची नवी दिल्लीत बैठक…

शासनाची संस्थात्मक बांधणी करण्यासाठी काळानुरूप बदल आवश्यक’जनतेला देण्यात येणा-या सेवा पारदर्शक, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त असाव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

महिला व बालकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील धरणात 152.78 दलघमी पाणीसाठा- पाच तालुक्यात 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा- जिल्हा व तालुका प्रशासनाच्या उपाययोजना सुरु- पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

भारतीय सैन्याने दाखविलेल्या पराक्रमाला  क्रांतीचौकात देशभक्तिपर गीतांच्या माध्यमातून भारतमातेचा जयघोष करीत सलाम करण्यात आला. देशसेवा करताना वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली