vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

ॲथलेटिक्स खेळाडूच्या निवड चाचणीचे आयोजन

ॲथलेटिक्स खेळाडूच्या निवड चाचणीचे आयोजन

 जालना, प्रतिनिधी :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्षवेध’ या धोरणात्मक योजनेतंर्गत जालन्यात क्रीडा क्रांती होणार आहे. या योजनेनुसार जालना येथे आर्चरी (धनुर्विद्या) आणि ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारांसाठी जिल्हा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारासाठी खेळाडूंची विशेष निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

या निवड चाचणीत 21 वर्षांखालील मुले व मुली सहभागी होऊ शकतात. खेळाडूकडे जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, 3 पासपोर्ट साईज फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि पालकांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे. तसेच खेळाडू महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे. खेळाडूनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे क्रीडा मार्गदर्शक आशिष जोगदंड (संपर्क- ८८८८३४६८२८) यांच्याशी संपर्क साधावा.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जालना येथे फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य योजनेंतर्गत जास्तीत जास्त सुविधा निर्मिती करावी-क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे 

शुभांगी संतोष घुले हिचे अमेरिका येथील अल्बामा येथे 21 व्या जागतिक अग्निशमन आणि पोलिस स्पर्धेमध्ये कांस्य पदक:

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ यावर्षी ७ नाेव्हेंबर रोजी आयोजित

vishwatmaklokswamivarta

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे खासदारांसोबत सायकल चालवली, नागरिकांना भारतात उत्पादित वस्तू विकत घेण्यासाठी केले प्रेरित आत्मनिर्भर व निरोगी भारताप्रति सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देत राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘गर्व से स्वदेशी’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव 20 मेपर्यंत सादर करण्याचे आवाहन