vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अक्षयतृतीयेला सांगली जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या  – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील- बालविवाह ठरला किंवा होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस   विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- नियम मोडल्यास होणार कडक कारवाई वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह   केल्यास होणार गुन्हे दाखल 

अक्षयतृतीयेला सांगली जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या  – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील- बालविवाह ठरला किंवा होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस   विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- नियम मोडल्यास होणार कडक कारवाई वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह   केल्यास होणार गुन्हे दाखल

सांगली, प्रतिनिधी: अक्षयतृतीयेचा मुहर्त हा अत्यंत शुभ मानला जातो मात्र या दिवशी छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्रामीण व शहरी भागात अक्षयतृतीया (19 एप्रिल ) होणाऱ्या विवाह सोहळयामध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांनी केले आहे.

  भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे 18 वर्ष पुर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बेकायेदशीर ठरतो. या कायद्याची अमंलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सक्रिय राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावागावात सरपंच, पोलीस पाटील आणि अगंणवाडी सेविका यांनी सर्तक राहून विवाहापूर्वी मुला – मुलींच्या वयाची खात्री करणे आवश्यक आहे. बालविवाह लावणे हा दखलपात्र गुन्हा असून यात केवळ पालकांवरच नाही तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, मंडप डेकोरेर्टस जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह केल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात. दोषींना २ वर्षे सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून संशयास्पद विवाहाची माहिती तात्काळ टोल फ्री 1098 या क्रमांकावर तक्रार देण्याचे आवाहान करण्यात आले आहे.

 

 येथे करा तक्रार ,तुमच्या गावात किंवा परिसरात बालविवाह ठरला असल्यास किंवा होत असल्यास त्याबाबतची माहिती चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम- परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

vishwatmaklokswamivarta

कल्याण मध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू ,जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय…

vishwatmaklokswamivarta

वडगाव शेरी मतदारसंघात पुरापासून संरक्षणाच्या कामांसाठी२५० कोटीचा निधी मंजूर- उद्योगमंत्री उदय सामंत

संपूर्ण नवी मुंबईत विविध विभागांत विठ्ठलनामाची शाळा भरवित विद्यार्थ्यांनी दिंड्यांतून जागविले स्वच्छता व आरोग्याचे महत्व…

सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त कर्मचाऱ्यांना दिलासा अधिसंख्य पद निर्मितीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित- सचिव तुकाराम मुंढे

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन