vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अक्षयतृतीयेला सांगली जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या  – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील- बालविवाह ठरला किंवा होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस   विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- नियम मोडल्यास होणार कडक कारवाई वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह   केल्यास होणार गुन्हे दाखल 

अक्षयतृतीयेला सांगली जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या  – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील- बालविवाह ठरला किंवा होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस   विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- नियम मोडल्यास होणार कडक कारवाई वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह   केल्यास होणार गुन्हे दाखल

सांगली, प्रतिनिधी: अक्षयतृतीयेचा मुहर्त हा अत्यंत शुभ मानला जातो मात्र या दिवशी छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्रामीण व शहरी भागात अक्षयतृतीया (19 एप्रिल ) होणाऱ्या विवाह सोहळयामध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांनी केले आहे.

  भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे 18 वर्ष पुर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बेकायेदशीर ठरतो. या कायद्याची अमंलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सक्रिय राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावागावात सरपंच, पोलीस पाटील आणि अगंणवाडी सेविका यांनी सर्तक राहून विवाहापूर्वी मुला – मुलींच्या वयाची खात्री करणे आवश्यक आहे. बालविवाह लावणे हा दखलपात्र गुन्हा असून यात केवळ पालकांवरच नाही तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, मंडप डेकोरेर्टस जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह केल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात. दोषींना २ वर्षे सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून संशयास्पद विवाहाची माहिती तात्काळ टोल फ्री 1098 या क्रमांकावर तक्रार देण्याचे आवाहान करण्यात आले आहे.

 

 येथे करा तक्रार ,तुमच्या गावात किंवा परिसरात बालविवाह ठरला असल्यास किंवा होत असल्यास त्याबाबतची माहिती चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सातारा, खटाव, फलटण येथील मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु*

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना-देशात महाराष्ट्र आणि राज्यात छत्रपती संभाजीनगर प्रथम

vishwatmaklokswamivarta

डिफेन्स क्लस्टरमुळे शिर्डी परिसरातील औद्योगिक विकासाला चालना – राधाकृष्ण विखे पाटील

जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताची दमदार कामगिरी, पहिल्याच सहभागात पटकावला आठवा क्रमांक

vishwatmaklokswamivarta

अभिजात मराठी भाषेचा गौरव वाढविण्यासाठी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा कटाक्षाने वापर करण्याचे साहित्यिक डॉ.महेश केळुसकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन हा संघ कमाल…. हा विजय ऐतिहासिक!