राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम, पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले
राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम, पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले
राज्य प्रतिनिधी-राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाचा अचूक खर्च काढण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी आपापल्या क्षेत्रातील पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत दिले.
राज्य मूल्य आयोगाकडून शेतीमालाचा रास्त भाव आणि उत्पादन खर्च निश्चित केला जातो. मात्र, हवामान बदलामुळे बियाणे, खते, मजुरी आणि उत्पादकता यामध्ये मोठे बदल झाले आहेत. हे लक्षात घेऊन राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली या चारही कृषी विद्यापीठांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यांमधील प्रमुख पिकांचा अभ्यास करावा. वाढलेली मजुरी, कीड-रोगांमुळे होणारा अतिरिक्त फवारणी खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे घटलेली उत्पादकता यांचा विचार अहवालात व्हावा, अशा सूचना कृषी मंत्री भरणे यांनी दिल्या
मंत्रालय परिषद सभागृह येथे झालेल्या बैठकीस राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार राजेश बकाने, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक सुनिल बोरकर यांच्यासह सर्व कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.